जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आठवड्यातून तीन दिवस “जनता दरबार” उपक्रम

Spread the love

धाराशिव : जिल्ह्यातील नागरिकांच्या शासकीय कामकाजातील अडचणी आणि तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी आता प्रत्येक आठवड्यात “जनता दरबार” उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून सुरू केला जात आहे.

या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे उपस्थित राहू शकतात.
या वेळेत नागरिकांना त्यांच्या शासकीय अडचणी, तक्रारी किंवा विनंत्या थेट जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडता येणार आहेत.

या दरबारात नागरिकांना अर्ज सादर करण्याची व समस्यांबाबत थेट संवाद साधण्याची संधी दिली जाणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करून तत्काळ निर्णय घेणे हा आहे.

याबाबतची अधिकृत माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!