धाराशिव : अलीकडील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. नुकसानाचे अचूक मूल्यांकन करून शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणींची तात्काळ दखल घ्यावी व मदत कार्यात विलंब होऊ नये, असेही स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी त्वरीत कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Category: politice
राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
धाराशिव ता.18: राणा पाटील गेल्या दहा वर्षापासून तुळजापूर मतदारसंघातून आमदार आहेत सत्तेत आहेत तरीही सभागृहात जनतेचे…
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासह मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेतील चर्चेदरम्यान आक्रमक भूमिका घेत…
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ…
आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
धाराशिव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार भारतीय जनता…
परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल परंडा पोलीस ठाणे :अवैध…
जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?
धाराशिव : जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून जिल्हा परिषदेवर महायुतीचेच वर्चस्व स्पष्ट होताना दिसत…
अफू लागवड प्रकरणी कारवाईनंतर समाधान उघडे यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुकवर घोषणा
धाराशिव : अवैध अफू लागवड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ठाकरे सेनेचे उपतालुका प्रमुख समाधान उघडे…
हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम
धाराशिव दि.७ फेब्रुवारी (जिमाका) आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले.यानिमित्ताने नागरिकांमध्ये मतदानाबाबत…
केंद्रीय अर्थसंकल्प : धाराशिव जिल्ह्यासाठी गेमचेंजर , जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला आणि रोजगार निर्मितीला नवा ‘बूस्ट’! – आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव : “टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, एमएसएमई पार्क आणि तीर्थक्षेत्रांच्या कायापालटातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. नव्या उद्योगांच्या…