धाराशिव-बार्शी रस्ता धोकादायक! खानापूरजवळ बस घसरली, औसा रस्त्यावर निकृष्ट कामामुळे वाढले अपघात

Spread the love

रस्ते झाले मृत्यूचे सापळे! नागरिक त्रस्त, प्रशासन झोपलेले!

धाराशिव – जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची दुरवस्था समोर येत आहे. धाराशिव ते बार्शीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खानापूरजवळ चिखल आणि माती साचल्यामुळे एका एसटी बसला थेट रस्त्यावरून घसरत जाण्याचा प्रसंग ओढवला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दुसरीकडे, धाराशिव ते सांजा मार्गे औसा कडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील निकृष्ट दर्जाचं काम सुरु आहे. अनेक ठिकाणी चिखल साचला असून अपघातांची संख्या वाढत आहे. बेंबळी रस्त्याप्रमाणेच या रस्त्याचंही काम भविष्यात खचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून सोडून दिलं आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावलेले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, “उन्हाळ्यात झोपलेले प्रशासन आता पावसाळ्यात जागं होणार का?” प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.

धाराशिवहून चिखलीमार्गे पाठीमागे जाणारी औसाकडे जाणारी एसटी बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली असून, गेल्या काही दिवसांत या मार्गावर दोन ते तीन वेळा एसटी बसच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवासी यामुळं मोठ्या अडचणीत आले असून प्रशासनाकडून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

#धाराशिवन्यूज
#उस्मानाबादन्यूज
#धाराशिव
#उस्मानाबाद
#अंतरसंवादन्यूज
#RoadAccident
#धाराशिवरस्ते
#PublicSafety
#PoorRoadWork
#MonsoonTroubles


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!