सुधारित आराखड्यास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदिल ः आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव रेल्वेस्थानक पूर्वी प्रस्तावित होते, त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. पर्यायी रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. प्रवाशांसह कर्मचारी आणि अधिकार्यांकरिता अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. रस्त्यांच्या वरून आणि खालून जाणार्या पुलांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सोलापूर शहरातील जमीन रेल्वेमार्गासाठी संपादन करण्याकरिता तेथील सध्या प्रचलित असलेले दर गृहित धरण्यात येणार आहेत. वरील सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३२९५ कोटी रूपयांच्या सुधारीत आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. धाराशिवला जंक्शन रेल्वे स्थानक होणार, अर्थकारणाला गतीही मिळणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र आता लवकरच रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर झळकणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव प्रकल्प किंमतीनुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने ५० टक्के तरतूद केल्यानंतर उर्वरित ५० टक्के राज्य हिश्याचा वाटा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ३२९५ कोटी रूपयांच्या सुधारित आराखड्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. एकूण ८४.४४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी ९०४ कोटी ९२ लाख रूपयांची मंजुरी देण्यात आली होती. आता त्यामध्ये तिपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आपण सातत्याने विधीमंडळात हा विषय लावून धरला होता. ठाकरे सरकारच्या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी तातडीने या महत्वपूर्ण रेल्वेमार्गासाठी राज्याचा ५० टक्के हिस्सा देण्याचा पावले उचलावीत, असा पाठपुरावाही आपण केला होता. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या महायुती सरकारने सुधारीत आराखड्यानुसार ५० टक्के राज्य हिश्याचा वाटा देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेले तुळजापूर रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आता झळकणार आहे. त्याचबरोबर तुळजापूर ते सोलापूर या टप्प्यातील रेल्वेमार्गाच्या कामालाही गती मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत चार हजार चौरस मीटरवरून आता १२ हजार ६३० चौरस मीटर होणार आहे. एकंदरीत रेल्वे स्थानकाची इमारत तिप्पट मोठी होणार आहे. वेगात जाणार्या जलदगती रेल्वेगाड्यांना तत्काळ मार्ग मिळावा यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्थाही उभारली जात आहे. यार्डाच्या आवश्यकतेनुसार मोठ्या लांबीची लूपलाईनही अंथरली जाणार आहे. पूर्वी रस्त्याखालून जाणार्या पुलांची संख्या २० होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून रस्त्याखालून रेल्वेमार्गासाठी ३१ पूल उभारले जाणार आहेत. सेालापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्वाच्या पुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. ३८५ मीटरऐवजी हा पूल ३९९ मीटर एवढा लांब असणार आहे. प्रवाशांसाठी अनेक महत्वपूर्ण सोयी-सुविधांचा या आराखड्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्म यासह जमिनीखाली आणि जमिनीच्या वर पाण्याच्या मोठ्या टाक्या उभारल्या जाणार आहे. त्यासाठीही दुप्पट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांच्या निवासस्थानांची संख्या ३४२ वरून ३७३ करण्यात आली आहे. त्यासाठी सुधारित आराखड्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने ३२९५ कोटी रूपयास मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
ठाकरे सरकारमुळे रखडलेल्या रेल्वेमार्गाला महायुती सरकारमुळे गती
ठाकरे सरकारने राज्य हिश्श्याचा ५० टक्के वाटा न दिल्यामुळेच धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम अडीच वर्षे रखडले होते. त्यामुळे प्रकल्प किंमतीतही तब्बल ११७.४९ टक्के वाढ झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०४.९२ कोटी रूपयांच्या मूळ प्रकल्प किंमत असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी आता ३२९५ कोटी रूपये लागणार आहेत. त्याचवेळी ठाकरे सरकारने हे पैसे उपलबध करून दिले असते तर रेल्वेमार्ग कदाचित आतापर्यंत पूर्णही झाला असता. यापूर्वी राज्य सरकारने मूळ प्रकल्प किमतीनुसार ४५० कोटी रुपयांचा राज्य हिश्श्याचा वाटा दिलेला आहे. आता वाढीव २००० कोटींपैकी १००० कोटींचा राज्य वाटा देण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ठाकरे सरकारमुळे रखडलेल्या रेल्वेमार्गाला आपल्या महायुती सरकारमुळे आता गती मिळाली असून धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व अजितदादा पवार यांचे आपण आभार मानतो असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?
- वाशी पोलिसांची धाडसी कारवाई; पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अफू लागवड प्रकरणी कारवाईनंतर समाधान उघडे यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुकवर घोषणा
- खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग , धाराशिवच्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी महत्वाचे पाऊल – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात
- अब..अबब.. शेतकऱ्याने लावला धाराशिव मध्ये 485.65 किलो अफू , कारवाई , ठाकरे सेनेच्या उपतालुका प्रमुख…!
- हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम
- तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळेंची प्रभावी एन्ट्री; विरोधकांच्या गोटात खळबळ
- केंद्रीय अर्थसंकल्प : धाराशिव जिल्ह्यासाठी गेमचेंजर , जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला आणि रोजगार निर्मितीला नवा ‘बूस्ट’! – आमदार राणाजगजितसिंह पाटील
- धारशिव वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जन नसल्याने रुग्णांचे हाल; एमआरआय यंत्र असूनही सेवा सुरू न झाल्याने संताप
















































