वाशी (प्रतिनिधी): वाशी तालुक्यातील सर्वात मोठी,सतत चर्चेत असणारी व सतत वादग्रस्त असणारी ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार अखेर उघड झाला आहे.राजकीय वरदहस्तामुळे सतत कारवाई साठी वाचत आलेले सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद, आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण देशमुख यांना अखेर शासन खाती रक्कम जमा करण्याचे आदेश जितेंद्र पापळकर (भाप्रसे)विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर विभाग यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे वाशी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तालुक्यातील ज्या सरपंच व ग्रामसेवकांनी अपहार केलेला आहे. त्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,वाशी तालुक्यातील पारा येथील वादी बाजीराव उद्धव भराटे यांनी तक्रार दिली होती त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी चौकशी केली असता वसंतराव नाईक तांडा सुधार रक्कम रुपये 233000/- ,अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजना रक्कम रुपये 60000/- व ग्रामनिधी खात्यावरील रक्कम रुपये 43000/- याप्रमाणे एकूण रक्कम
336000/- रुपये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांचे नावे उचलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितांमधील वित्तीय नियमांचे उल्लंघन करून अनियमितता केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ग्रामपंचायत ने विकास कामे करताना तसेच साहित्य खरेदी करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेनुसार व शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी च्या कार्यपद्धतीबाबत शासन परिपत्रक दि. 22/9/2022 नुसार दिलेल्या सूचनेनुसार खरेदी केलेल्या वस्तूंची गुणवत्ता तपासणी करणे.देयका मधून शासकीय कपात करणे याप्रमाणे कार्यवाही केल्याचे सादर अभिलेखांवरून दिसून येत नाही. यास सरपंच व ग्राम विकास अधिकारी प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी कार्यालयास प्राप्त झाले.
त्यानंतर दि.6/1/ 24, दि.11/12/ 24 ला सुनावणी झाली. दि. 13 /5/25 रोजी सुनावणी झाली त्यावेळी प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती वाशीचे सहाय्यक गट विकास अधिकारी बी. एस. राठोड, विस्तार अधिकारी( पं) व्ही.बी.रूपवट, पी.बी.देशमुख तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी व कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी ए. बी. शेख या सुनावणीस उपस्थित राहिले. यानंतर पुढील तारीख 24/6 /25 नंतर दि.15 /7/ 25 , दि.29 /7 /25 ,दि. 12 /8/25 रोजी निकालासाठी राखीव ठेवून सदर प्रकरणातील निर्णय दि. 30 /9 /25 रोजी
(1) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांचा अहवाल जा. क्र. जि. प. धा/सा. प्र. वि./2/ग्रा. प. वि.8/सीआर-ई -855774/कावि/56/2024 दि.28 /1/2025 मान्य करण्यात येतो.
(2) गैरअर्जदार राजेंद्र पांडुरंग काशीद सरपंच ग्रामपंचायत पारा ता. वाशी यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 ( 1) मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात येत आहे.
(3) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी उक्त चौकशी अहवालाच्या अनुषंगाने अपहारित रक्कम निश्चित करण्यासाठी विशेष समिती गठित करून सदर रक्कम शासनखाती भरण्याची कार्यवाही करावी. तसेच अपहारित रकमेची वसुली न झाल्यास नियमानुसार संबंधितांच्या मालमत्ता जसे 7/12 वर अपहारित रकमेचा बोजा टाकण्याची कार्यवाही करावी. असे आदेश जितेंद्र पापळकर भाप्रसे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर विभाग यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करून सरपंच राजेंद्र काशिद यांच्या कडील अपहारित रक्कम कशी आणि किती दिवसात वसूल करतात आणि ग्रामविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या वर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव काय कार्यवाही करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न
- ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; वाद मिटविण्याची सुवर्णसंधी
- अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज – प्रा.ॲड.मंजुषा साखरे
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न





























