धाराशिव नगर परिषदेला 140 कोटी निधी मंजूर केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री तानाजी सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांचे आभार माना
निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवाद लाटण्यासाठी थयथयाट कशाला?
शिवसेनेचे धाराशिवचे शहरप्रमुख आकाश कोकाटे यांचा 140 कोटीचे श्रेय घेणाऱ्यांना थेट इशारा
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला.
या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्या मंडळींनी मंत्री महोदयांचे आभार मानायला पाहिजे होते.
परंतु निधी कोणी मंजूर केला आणि कोणी मंजूर करवून आणला याचे भान स्वार्थाचे राजकारण आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे महापाप करणार्यांना राहिलेले नाही. म्हणून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट करणार्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख भाई एकनाथजी शिंदे, तत्कालीन पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत आणि निधीचा दुरूपयोग करणार्यावर नियमाचा बडगा उगारणारे विद्यमान पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचे आभार मानायचे सोडून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट सुरू केला आहे. पण श्रेयवादासाठी राजकीय पक्षाच्या व त्यांच्या इतर त्यांच्या बगलबच्चांना जनता यावेळेस माफ करणार नाही याचे भान त्यांनी बाळगावे, अन्यथा नगर परिषद निवडणुकीत तुम्हाला एकही जागा पदरी पडणार नाही.
धाराशिव शहरातील नागरिकांची रस्त्यांची गैरसोय लक्षात घेवून विविध भागातील 59 रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री भाई एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदे यांनी तब्बल 140 कोटी रूपयांचा निधी धाराशिव नगर परिषदेकरिता मंजूर केला. म्हणून काही राजकीय मंडळींनी निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
मात्र निधी कोणी खेचून आणला याचे भान मात्र त्या नेत्यांना राहिले नाही. केवळ बॅनरबाजी करून राजकारण चालत नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विचारावर आजही शिवसेना टिकून आहे, हे बॅनर बाजी करणाऱ्यानी लक्षात ठेवले पाहिजे.
धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था करून ठेवलेले उबाठाचे खासदार, आमदार आणि तत्कालीन नगराध्यक्ष 140 कोटीच्या निधीवर देखील डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपल्या धाराशिवचे विद्यमान कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांनी सदरील निविदा ही चुकीच्या पद्धतीने केली आहे नियमांचा भंग करून केली आहे
काही राजकीय मंडळींच्या लाडक्या गुत्तदाराला सदर 140 कोटी चे काम मिळावे यासाठी अत्यंत टोकाचे प्रयत्न केले आहेत.
तरी देखील ‘गिरे भी तो टांग ऊपर’ या उक्तीप्रमाणे आम्हीच हा निधी मिळवून आणला आणि शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आमच्यामुळेच होणार असा डांगोरा पिटण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. त्यांना येत्या निवडणुकीत चिखल आणि धुरळ्यात जगणारे धाराशिवकर उताणे पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
धाराशिव शहरवासियांना भुयारी गटार योजनेची गरज नसताना शहरातील सर्व रस्त्यांचे खोदकाम करून निधीचा धुरळा उडविला. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुरळा सोसत धाराशिवकर खड्डयांमधून आजही वाट काढत आहेत. परंतु जनतेच्या समस्येऐवजी आपला स्वार्थ साधणार्या लोकांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगर परिषदेची सत्ता हडपण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही निवडणूक यावेळेस इतकी सहज-सोपी नाही हे त्यांच्या लक्षात आलेली नाही. म्हणून ऐनवेळी निधी आम्हीच आणला अशा वल्गना करणार्या आणि इतके दिवस झोपा काढणार्यांना एवढेच सांगणे आहे की जर तुमच्यात हिंमत होती तर धाराशिव शहराचा विकास का झाला नाही? विकासाचे श्रेय घेण्यासाठी पुढे या, पण तुम्ही काय दिवे लावले ते आधी जनतेला सांगा आणि मगच जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्या.
जनतेने एकदा विश्वास ठेवला म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीप्रमाणे उगीच काहीही बरळू नये. धाराशिव शहराचा खरेच विकास करायचा होता तर धाराशिव शहरवासियांना खड्डयांच्या खाईत कोण लोटले? स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी लाटून जनतेला दुर्गंधीत कोण ढकलले? अंतर्गत रस्त्यांवर भुयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्ते उकरून लोकांचा बळी घेणारे एकदा तरी लाजले का? स्वतःचे पाप झाकण्यासाठी बगलबच्चांना पुढे करुन आंदोलनाची नौटंकी करणार्यांना अजुनही लाज वाटत नाही का? पिण्याच्या पाण्याचीही बोंब असताना केवळ निधीच्या श्रेयवादावरून प्रत्येकवेळी थयथयाट कशाला? धाराशिवकर जनता सूज्ञ आहे. तुमची नौटंकी जाणून आहे. म्हणून यापुढील काळात निधी कोणी आणला, कोणी दिला यावर भाष्य करण्यापेक्षा जनतेसमोर सत्य मांडा. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जनतेची माथी भडकविण्यापेक्षा स्वतः आपण कोणत्या पायरीवर आहोत याचे भान ठेवा आणि मगच राजकारण खेळा. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारांवर आजचा महाराष्ट्र वाटचाल करतोय. त्याला स्वार्थासाठी खीळ घालण्यापेक्षा स्वतः या मार्गावर या, तरच तुम्हाला राजकारण आणि समाजकारणाचा फरक कळेल आणि धाराशिवच्या विकासात योगदान द्यायचे नसेल तर आडकाठी आणू नका, एवढेच तुम्हाला सांगणे आहे. अशी प्रतिक्रिया आकाश कोकाटे यांनी प्रेस नोट द्रारे दिली आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील





































