धाराशिव, दि. ३० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी धडक कारवाई केली आहे. लोहारा, उमरगा, नळदुर्ग आणि तुळजापूर पोलिस ठाण्यांत एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, हजारो रुपयांच्या प्रतिबंधित साहित्याची जप्ती करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या मुख्य शहरात अशी कारवाई कधी होणार आणि लहान टपऱ्या-दुकानदारांवरच कारवाई का होते, तर मोठ्या डीलरांवर अंकुश का लावला जात नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
लोहारा पोलिसांची कारवाई
लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हिप्परगा रवा येथे योगेश सुरेश जाधव या आरोपीच्या पंक्चर दुकानात तपासणी करण्यात आली. यावेळी केसरयुक्त विमल पान मसाला आणि तंबाखूचे ४५-४५ पुडे, एकूण १३,५०० रुपयांच्या प्रतिबंधित साहित्याची विक्रीसाठी साठवणूक असल्याचे आढळले. पोलिसांनी साहित्य जप्त करून भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला.
उमरगा पोलिसांची कारवाई
उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.४० वाजता तुरोरी येथील सौदागर किराणा दुकानात साजीद शरीफ चपराशी या २२ वर्षीय आरोपीकडे प्रतिबंधित विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, डायरेक्टर पान मसाला आणि शॉ ९९९ या साहित्याची २,०५९ रुपयांची साठवणूक आढळली. पोलिसांनी साहित्य जप्त करून वरीलच कलमांनुसार गुन्हा नोंदवला.
नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई
नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी पाच आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. यात संतराम भुजंगराम कांबळे (वय ६६, अणदुर) यांच्याकडे केसरयुक्त विमल पान मसाला आणि व्ही वन तंबाखूचे २७० रुपयांचे साहित्य; विश्वनाथ राम हांगडे (वय ४८, फुलवाडी) यांच्याकडे केसरमिश्रीत प्रीमियम सुपर जेन पान मसाला, व्ही वन तंबाखू आणि एस.पी.९९९ तंबाखूचे ३९० रुपयांचे साहित्य; मुनाफ अब्दुल शेख (वय ६०, काटगाव) यांच्याकडे केसरयुक्त विमल पान मसाला, गाय छाप तंबाखू आणि डायरेक्टर स्पेशल पान मसाल्याचे ५९५ रुपयांचे साहित्य; शिराज महंमद मुजावर (वय ४५, काटगाव) यांच्याकडे गाय छाप तंबाखूचे ५०५ रुपयांचे साहित्य; आणि सुनिल शंकर तिवारी (वय ३०, काटगाव) यांच्याकडे डायरेक्टर स्पेशल पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला आणि गाय छाप तंबाखूचे ४७५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व प्रकरणांत कलम ६ (ब), २४ सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंध आणि वाणिज्य पुरवठा विनियम अधिनियम २००३ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले.
तुळजापूर पोलिसांची कारवाई
तुळजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.२० वाजता सिंदफळ येथील आनंदवन बार अँड हॉटेलजवळील पान शॉपमध्ये हनुमंत बाबुराव माळी (वय ३१) यांच्याकडे डायरेक्टर स्पेशल पान मसाला आणि विमल पान मसाल्याचे ६३२ रुपयांचे प्रतिबंधित साहित्य आढळले. पोलिसांनी साहित्य जप्त करून कलम ६ (अ), २४ सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंध आणि वाणिज्य पुरवठा विनियम अधिनियम २००३ अन्वये गुन्हा दाखल केला.
या कारवायांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध तंबाखू विक्रीला आळा बसण्यास मदत होत असली तरी, धाराशिव शहरात अशी मोठी कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, लहान टपऱ्या आणि दुकानदारांवरच कारवाई होते, पण मोठ्या डीलर आणि पुरवठादारांवर अंकुश का लावला जात नाही? पोलिस अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरणाची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हाSpread the love धाराशिव, दि. 13 : लग्न लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करून नंतर 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज संग्राम पाटील (वय 28, मूळ रा. सुंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड, सध्या रा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय…
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातSpread the loveखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात धाराशिव : दि.10/06/2026 रोजी पोलीस ठाणे आंबी गुरण ९३/२६ कलम 103 (1), 3 (5) BNS प्रमाणे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खुनाचे प्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार असून नमूद फरार आरोपी नामे दीपक विक्रम गरड रा. चिंचपूर खुर्द ता. परंडा जि. धाराशिव हा बसवकल्याण, राज्य कर्नाटक…
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीSpread the loveवादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धाराशिव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या…
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्तSpread the love अहिल्यानगर, दि. ३ जून :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले…
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटीलSpread the loveकर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण धाराशिव ता.3: राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून त्यांची थट्टा करणारी असल्याच मत आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे.त्यामध्ये ते म्हणाले की, २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या तब्बल…




