धाराशिव, दि. ३० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी धडक कारवाई केली आहे. लोहारा, उमरगा, नळदुर्ग आणि तुळजापूर पोलिस ठाण्यांत एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, हजारो रुपयांच्या प्रतिबंधित साहित्याची जप्ती करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या मुख्य शहरात अशी कारवाई कधी होणार आणि लहान टपऱ्या-दुकानदारांवरच कारवाई का होते, तर मोठ्या डीलरांवर अंकुश का लावला जात नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
लोहारा पोलिसांची कारवाई
लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हिप्परगा रवा येथे योगेश सुरेश जाधव या आरोपीच्या पंक्चर दुकानात तपासणी करण्यात आली. यावेळी केसरयुक्त विमल पान मसाला आणि तंबाखूचे ४५-४५ पुडे, एकूण १३,५०० रुपयांच्या प्रतिबंधित साहित्याची विक्रीसाठी साठवणूक असल्याचे आढळले. पोलिसांनी साहित्य जप्त करून भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला.
उमरगा पोलिसांची कारवाई
उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.४० वाजता तुरोरी येथील सौदागर किराणा दुकानात साजीद शरीफ चपराशी या २२ वर्षीय आरोपीकडे प्रतिबंधित विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, डायरेक्टर पान मसाला आणि शॉ ९९९ या साहित्याची २,०५९ रुपयांची साठवणूक आढळली. पोलिसांनी साहित्य जप्त करून वरीलच कलमांनुसार गुन्हा नोंदवला.
नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई
नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी पाच आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. यात संतराम भुजंगराम कांबळे (वय ६६, अणदुर) यांच्याकडे केसरयुक्त विमल पान मसाला आणि व्ही वन तंबाखूचे २७० रुपयांचे साहित्य; विश्वनाथ राम हांगडे (वय ४८, फुलवाडी) यांच्याकडे केसरमिश्रीत प्रीमियम सुपर जेन पान मसाला, व्ही वन तंबाखू आणि एस.पी.९९९ तंबाखूचे ३९० रुपयांचे साहित्य; मुनाफ अब्दुल शेख (वय ६०, काटगाव) यांच्याकडे केसरयुक्त विमल पान मसाला, गाय छाप तंबाखू आणि डायरेक्टर स्पेशल पान मसाल्याचे ५९५ रुपयांचे साहित्य; शिराज महंमद मुजावर (वय ४५, काटगाव) यांच्याकडे गाय छाप तंबाखूचे ५०५ रुपयांचे साहित्य; आणि सुनिल शंकर तिवारी (वय ३०, काटगाव) यांच्याकडे डायरेक्टर स्पेशल पान मसाला, केसरयुक्त विमल पान मसाला आणि गाय छाप तंबाखूचे ४७५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व प्रकरणांत कलम ६ (ब), २४ सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंध आणि वाणिज्य पुरवठा विनियम अधिनियम २००३ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले.
तुळजापूर पोलिसांची कारवाई
तुळजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.२० वाजता सिंदफळ येथील आनंदवन बार अँड हॉटेलजवळील पान शॉपमध्ये हनुमंत बाबुराव माळी (वय ३१) यांच्याकडे डायरेक्टर स्पेशल पान मसाला आणि विमल पान मसाल्याचे ६३२ रुपयांचे प्रतिबंधित साहित्य आढळले. पोलिसांनी साहित्य जप्त करून कलम ६ (अ), २४ सिगारेट व इतर तंबाखू उत्पादन जाहिरात प्रतिबंध आणि वाणिज्य पुरवठा विनियम अधिनियम २००३ अन्वये गुन्हा दाखल केला.
या कारवायांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध तंबाखू विक्रीला आळा बसण्यास मदत होत असली तरी, धाराशिव शहरात अशी मोठी कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, लहान टपऱ्या आणि दुकानदारांवरच कारवाई होते, पण मोठ्या डीलर आणि पुरवठादारांवर अंकुश का लावला जात नाही? पोलिस अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरणाची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक Spread the loveकोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक धाराशिव ता.14: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने 134 कोटी रुपये शेतकऱ्यांना पिक विम्या पोटी वितरीत करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी मात्र ही रक्कम कोणतीही स्थगिती नसताना अडवली आहे. ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावी अशी…
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडलाSpread the loveतुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला तुळजापूर : शहरातील जामा मस्जिद परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत उपवास सोडला. मुस्लिम…
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णीSpread the love धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर महायुतीने जिल्ह्यात सत्ता स्थापन करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने…
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडेSpread the loveआ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडेपुण्यातील कचरा प्रक्रिया केंद्राला दिली भेट धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – पुणे येथील ग्रीन पृथ्वी सोल्युशन या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीस नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने दि.१० मार्च रोजी भेट दिली. तसेच प्रक्रिया संयंत्र केंद्र ( प्रोसेस प्लांट) ची पाहणी केली. यावेळी…
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी Spread the loveअरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी धाराशिव ता.12: स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ गतीने होत असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सांगत हा प्रश्न…




