खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा आरोग्य विभागाचे आवाहन – डॉ. सतीश हरिदास

Spread the love

 

धाराशिव दि.१८ जून (प्रतिनिधी ) राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभाग,जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विविध पदभरती प्रक्रिया ही शासनाच्या विहीत नियमांनुसार व अधिकृत संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतरच जाहीर केली जाते.यामध्ये जाहिरात, पात्र-अपात्र यादी,गुणवत्ता यादी, अंतिम गुणवत्ता यादी,कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असतो.मात्र,अलीकडे असे निदर्शनास आले आहे की काही अज्ञात व्यक्ती या अधिकृत माहितीमध्ये छेडछाड करून बनावट निवड यादी तयार करत आहेत व उमेदवारांना खोट्या आदेशानुसार कागदपत्र तपासणी व वैद्यकीय तपासणीसाठी बोलावत आहेत.

तरी सर्व उमेदवारांना स्पष्ट आवाहन करण्यात येते की,फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झालेलीच माहिती अधिकृत समजावी.निवड यादी किंवा अन्य माहितीबाबत शंका असल्यास थेट कार्यालयास भेट देऊन खात्री करावी.

कृपया कोणत्याही मध्यस्थ,एजंट किंवा त्रयस्थ व्यक्तीकडून मिळालेल्या बनावट कागदपत्रे,यादी अथवा आश्वासनांवर विश्वास ठेवू नये.अशा खोट्या आश्वासनांना किंवा आर्थिक व्यवहारांना बळी पडल्यास याची जबाबदारी हे कार्यालय घेणार नाही.

अशा फसवणुकीचा बळी झाल्यास संबंधित उमेदवारांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करावी.असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!