धाराशिव –
खरीप २०२० हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे. आपल्या महायुती सरकारने १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपये इतका निधी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास अंतिम मान्यता दिली आहे. मा . सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होत्या. याविरोधात आपण शेतकरी बांधवांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने २४ नोव्हेंबर २०२५ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, विमा कंपनीचा दुसरा हप्ता रोखून तो थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. याच आदेशाची अंमलबजावणी करत, आपल्या महायुती सरकारने बुधवार ११ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यासाठी १३४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. १३४.११ कोटींचा हा निधी कृषी आयुक्तालयाच्या ESCROW बँक खात्यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांना वर्ग केला जाणार आहे.
बजाज अलियांज विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेले ७५ कोटी रुपये आणि त्यावरील व्याजही पात्र शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी वापरले जाणार आहे. त्याची सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे. त्याकडेही आपले लक्ष असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच आहे. मागील पाच वर्षांपासून आपण शेतकरी बांधवांच्या सोबतीने सलग जिल्हा प्रशासनाकडे आणि न्यायालयात पाठपुरावा करत होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही विमा कंपनीची याचिका फेटाळल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविम्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता प्रत्यक्ष निधी वर्ग करण्याचा शासन निर्णय निघाल्याने हजारो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण कराSpread the love धाराशिव | प्रतिनिधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील १६.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित…
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडेSpread the love धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असून तो तात्काळ आणि ताबडतोब रद्द करण्यात यावा या मागणीसाठी धाराशिव येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप व रुक्मिणी लोंढे यांच्या उपस्थितीत दि.२८ जुलै रोजी महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये…
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटपSpread the loveईटकूर (ता. कळंब) : मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने ईटकूर (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मल्हार पाटील यांनी शाळेला भेट देत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना…
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागरSpread the love धाराशिव : आषाढी वारीचे औचित्य साधून श्री लिटल चॅम्प प्री. स्कूल, धाराशिव येथे वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभाग घेत विठ्ठलभक्तीचा संदेश दिला. टाळ, माळ, फेटा, नऊवारी साडी आणि पारंपरिक पोशाखामुळे शाळेचा परिसर भक्तिमय वातावरणाने…
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटीलSpread the loveवीस विभागांमध्ये तपासणी व उपचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदानातूनही समाजसेवेचा संदेश धाराशिव : “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून, रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहण्याइतके मोठे सुख दुसरे नाही. सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी नियमित महाआरोग्य शिबिरे घेण्याचा आपला संकल्प असल्याचे भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या…