धाराशिव –
खरीप २०२० हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे. आपल्या महायुती सरकारने १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपये इतका निधी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास अंतिम मान्यता दिली आहे. मा . सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होत्या. याविरोधात आपण शेतकरी बांधवांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने २४ नोव्हेंबर २०२५ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, विमा कंपनीचा दुसरा हप्ता रोखून तो थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. याच आदेशाची अंमलबजावणी करत, आपल्या महायुती सरकारने बुधवार ११ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यासाठी १३४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. १३४.११ कोटींचा हा निधी कृषी आयुक्तालयाच्या ESCROW बँक खात्यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांना वर्ग केला जाणार आहे.
बजाज अलियांज विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेले ७५ कोटी रुपये आणि त्यावरील व्याजही पात्र शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी वापरले जाणार आहे. त्याची सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे. त्याकडेही आपले लक्ष असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच आहे. मागील पाच वर्षांपासून आपण शेतकरी बांधवांच्या सोबतीने सलग जिल्हा प्रशासनाकडे आणि न्यायालयात पाठपुरावा करत होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही विमा कंपनीची याचिका फेटाळल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविम्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता प्रत्यक्ष निधी वर्ग करण्याचा शासन निर्णय निघाल्याने हजारो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखलSpread the loveधाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण झाले आहे अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे व त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधिक माहिती खालील प्रमाणे. लैंगीक अत्याचार.” येरमाळा पोलीस ठाणे :एका गावातील 14 वर्षे 5 महिने महिला (नाव- गावगोपनीय) दि.07.04.2026 रोजी 17.00 वा. सु. हि एकटी असल्याचा…
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराSpread the love धाराशिव : जिल्ह्यातील वर्ग-२ जमिनी, प्लॉट आणि घरांच्या वर्ग-१ प्रक्रियेत महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या कथित अडवणुकीविरोधात शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक झाले आहेत. हजारो प्रकरणे प्रलंबित राहिल्याने जमीन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून, बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली…
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पणSpread the love हैदराबाद येथील श्री तुळजाभवानी देवींचे भाविक पटोला सबिथा इंद्रा रेड्डी यांनी आज श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार व ढाल अर्पण केली. रेड्डी हे आज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीला सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार आणि ढाल अर्पण करून श्री तुळजाभवानी…
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्नSpread the love धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) धाराशिव जिल्हा अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक आज जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संघटन बळकटीकरण, आगामी राजकीय रणनीती तसेच विभागीय कामकाजाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस निरीक्षक म्हणून जावेद खरेदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जीवनरावजी गोरे, राष्ट्रीय अध्यक्ष युवती सक्षनाताई सलगर, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह…
- ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; वाद मिटविण्याची सुवर्णसंधीSpread the love धाराशिव,दि.६ मे (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपले वाद सामोपचाराने निकाली काढावेत,असे आवाहन करण्यात आले आहे. या लोकअदालतीत मोटार वाहन अपघात प्रकरणे,कौटुंबिक…