खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग , धाराशिवच्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी महत्वाचे पाऊल – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Spread the love


धाराशिव
खरीप २०२० हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अखेर विजय झाला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे. आपल्या महायुती सरकारने १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपये इतका निधी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास अंतिम मान्यता दिली आहे. मा . सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होत्या. याविरोधात आपण शेतकरी बांधवांच्या सहकार्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने २४ नोव्हेंबर २०२५ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशानुसार, विमा कंपनीचा दुसरा हप्ता रोखून तो थेट शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते. याच आदेशाची अंमलबजावणी करत, आपल्या महायुती सरकारने बुधवार ११ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यासाठी १३४ कोटी ११ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. १३४.११ कोटींचा हा निधी कृषी आयुक्तालयाच्या ESCROW बँक खात्यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांना वर्ग केला जाणार आहे.

बजाज अलियांज विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेले ७५ कोटी रुपये आणि त्यावरील व्याजही पात्र शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी वापरले जाणार आहे. त्याची सुनावणी उद्या न्यायालयात होणार आहे. त्याकडेही आपले लक्ष असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच आहे. मागील पाच वर्षांपासून आपण शेतकरी बांधवांच्या सोबतीने सलग जिल्हा प्रशासनाकडे आणि न्यायालयात पाठपुरावा करत होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही विमा कंपनीची याचिका फेटाळल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविम्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता प्रत्यक्ष निधी वर्ग करण्याचा शासन निर्णय निघाल्याने हजारो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

  • ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
    Spread the loveई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित धाराशिव दि.२८ मार्च (जिमाका ) राज्य शासनाच्या कार्यालयीन मूल्यमापनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आज मुंबई येथील…
  • तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
    Spread the loveतुळजापूर : शहरातील तुळजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी जव्हेरिया जुबेर शेख हिने लहान वयातच उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.ऑलिम्पियाड परीक्षेतील गणित विषयात तिने तब्बल 97.98% गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने जव्हेरियाचा विशेष सत्कार करण्यात आला.शाळेचे प्राचार्य लोद मॅडम व राजेश…
  • अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
    Spread the love महाराष्ट्रात मार्च महिना म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ. रब्बी हंगामातील पिके हातात येण्याचा, वर्षभराच्या कष्टांचे फळ मिळण्याचा हा काळ असतो. परंतु यंदा पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरवले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे…
  • तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
    Spread the loveतुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम तुळजापूर : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भक्तांसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी…
  • धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
    Spread the love धाराशिव : अलीकडील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. नुकसानाचे अचूक मूल्यांकन करून शासनाच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांच्या अडचणींची तात्काळ दखल घ्यावी व मदत कार्यात विलंब होऊ नये, असेही स्पष्ट केले. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी असून, त्यासाठी त्वरीत कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. Spread the love


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!