धाराशिव : पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे कृष्णेचे ४० टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात आणण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येत आहे. दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातून वाहून जाणारे हे पाणी १०० किलोमीटर बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. आणि त्यानंतर हे ४० टीएमसी पाणी बीड, धाराशिव, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांमध्ये वितरित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊ केले असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे..
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पुरस्थितींवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आणि मराठवाड्यातील दुष्काळी भागांना जलसंपत्ती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमाअंतर्गत, कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीतून दरवर्षी वाहून जाणारे अंदाजे ४० टीएमसी पाणी १०० किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. २०१९ साली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे पुराचे पाणी समुद्रात न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागांच्या सिंचनासाठी करणे आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्थेच्या ‘कृष्णा पुरनियंत्रण प्रकल्प ‘ अंतर्गत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून ९६३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये नद्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, आणि जलवाहिनी प्रणाली सुधारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, पुराचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये वळविण्याची योजना आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प’ बाबत महत्वाची बैठक पुणे येथील महाराष्ट्र कृष्णखोरे विकास महामंडळ कार्यालयात सोमवार २ जून रोजी पार पडली.बैठकीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पुरपरिस्थितीवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी हे अधिकचे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेचे तांत्रिक सल्लागार या प्रकल्पाचा ‘प्रकल्प व्यवहार्यता अहवाल'(Feasibility Report) पुढी तीन महिन्याच्या आत सादर करणार असल्याचेहे आमदार पाटील यांनी म्हटले आहेयावेळी कृष्णा खोरे महामंडळचे कार्यकारी संचालक श्री.अतुल कपोले,सचिव वी एम कुलकर्णी,मुख्य अभियंता गुणाले,मुख्य अभियंता धुमाळ,उपसचिव सविता बोधेकर,अधीक्षक अभियंता शिल्पा जाधव (पाणी तंटा लवाद पुणे) अधीक्षक अभियंता कोल्हापूर अभिजीत मेत्रे,कृष्णा मराठवाडा प्रकल्प अधीक्षक अभियंता थोरात,कार्यकारी अभियंता नाईक उपस्थित होते.
मराठवाड्याला ४० टीएमसी पाणी मिळणार.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुळे होणाऱ्या या प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पुरस्थितींवर नियंत्रण करता येणार असून शेत जमिनीचे, पिकांचे व जीविताचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे तर दुसरीकडे बीड, धाराशिव या दुष्काळग्रस्त भागांना ४० टीएमसी पाणी उपलब्ध होऊन लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेती उत्पादनात वाढ.स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवून आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी





























