धाराशिव (दि.५ जून) – राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असून, सरकारने निवडणूक काळात दिलेली आश्वासने आणि योजना केवळ कागदावरच राहिल्याची टीका आज धाराशिव येथील समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीला खासदार, आमदार कैलास पाटील आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आमदार कैलास पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करताना सांगितले की,
> “सत्ताधारी तिन्ही पक्षांनी कर्जमाफी, वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान यांसारख्या गाजावाजाच्या योजना जाहीर केल्या, मात्र प्रत्यक्षात काहीच दिले गेले नाही. सरकारने सरड्यालाही लाजवेल इतक्या वेगाने रंग बदलले आहेत.”
या पार्श्वभूमीवर, राज्यभर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरणार असून लवकरच तीव्र आंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्ह्यातील आजी-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, तालुका संघटक, विधानसभा संघटक, उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख, गणप्रमुख तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाचे मुद्दे:
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर टीका
कर्जमाफी आणि अनुदान योजना अंमलात नाहीत
सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
राज्यभर आंदोलनाची घोषणा
#ShivsenaUBT
#धाराशिव
#उस्मानाबाद
#धाराशिवन्यूज
#उस्मानाबादन्यूज
#अंतरसंवादन्यूज
#baithak
#ShivSenaMeeting
#FarmerProtest
#PoliticalNews
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न
- ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; वाद मिटविण्याची सुवर्णसंधी
- अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज – प्रा.ॲड.मंजुषा साखरे
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न




















