शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर घणाघात; धाराशिव येथे शिवसेनेची पदाधिकाऱ्यांची बैठक

Spread the love

धाराशिव (दि.५ जून) – राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असून, सरकारने निवडणूक काळात दिलेली आश्वासने आणि योजना केवळ कागदावरच राहिल्याची टीका आज धाराशिव येथील समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.

धाराशिव येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना आमदार कैलास पाटील

या बैठकीला खासदार, आमदार कैलास पाटील आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आमदार कैलास पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करताना सांगितले की,

> “सत्ताधारी तिन्ही पक्षांनी कर्जमाफी, वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान यांसारख्या गाजावाजाच्या योजना जाहीर केल्या, मात्र प्रत्यक्षात काहीच दिले गेले नाही. सरकारने सरड्यालाही लाजवेल इतक्या वेगाने रंग बदलले आहेत.”

या पार्श्वभूमीवर, राज्यभर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरणार असून लवकरच तीव्र आंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला जिल्ह्यातील आजी-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, तालुका संघटक, विधानसभा संघटक, उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख, गणप्रमुख तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 महत्वाचे मुद्दे:

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर टीका

कर्जमाफी आणि अनुदान योजना अंमलात नाहीत

सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी

राज्यभर आंदोलनाची घोषणा

#ShivsenaUBT
#धाराशिव
#उस्मानाबाद
#धाराशिवन्यूज
#उस्मानाबादन्यूज
#अंतरसंवादन्यूज
#baithak
#ShivSenaMeeting
#FarmerProtest
#PoliticalNews


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!