धाराशिव,दि.२६ ऑगस्ट (प्रतिनिधी ) आगामी श्रीगणेशोत्सव,विसर्जन मिरवणुका तसेच ईद-ए-मिलाद या पारंपरिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये धाराशिव जिल्ह्यात २६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी लागू करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक यांच्या सूचनेनुसार, श्रीगणेश उत्सव दिनांक २७ ऑगस्टपासून सुरू होत असून ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी विसर्जन होणार आहे.तसेच ७,८ व ९ सप्टेंबर रोजी अकरा,बारा व तेरा दिवसांचे गणपती विसर्जन पार पडणार आहेत. याशिवाय ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादचा सण साजरा होणार आहे.या काळात मिरवणुका,जुलूस व शोभायात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लाझमा व लेझर लाईटचा वापर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,या प्रखर प्रकाशामुळे लहान मुले,ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी निर्बंध लागू करताना सांगितले की,“जिल्ह्यातील सर्व सण-उत्सव, विसर्जन मिरवणुका व जुलूस शांततेत,सुरक्षिततेत व कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी प्लाझमा, बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर टाळणे अत्यावश्यक आहे.”
त्यामुळे,२६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ दरम्यान कोणत्याही मिरवणुका,शोभायात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमात अशा प्रकारच्या लाईटचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या आदेशामुळे सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होऊन नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व कायदा- सुव्यवस्था अबाधित राहील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल




























