धाराशिव विश्रामगृह येथे आमदार कैलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संघटनांसोबत ग्रामविकासावर सविस्तर चर्चा!

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्य, व प्रतिनिधींसमवेत आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव विश्रामगृह येथे महत्वपूर्ण संवाद बैठक घेतली. या बैठकीत ग्रामपंचायतींच्या प्रशासनिक, राजकीय तसेच निधीवाटपाशी संबंधित अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान सरपंच संघटनांनी अनेक समस्यांचा पाढा मांडला. यामध्ये १५ व्या वित्त आयोगातील 9505 व 8515 कोडचे निधी अडकल्याची तक्रार, मुद्रांक शुल्क वेळेत न मिळणे, दलित वस्ती व इतर जनसुविधा निधीच्या वाटपातील असमानता, तसेच ग्रामपंचायतींसोबत प्रशासनाच्या संवादातील उदासीनता अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.

आमदार कैलास पाटील यांनी सर्व प्रतिनिधींच्या अडचणी संयमाने ऐकून घेतल्या आणि त्यावर लवकरच उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले. तालुक्यातील ग्रामविकासासाठी ग्रामपंचायती हे बळकट व्हाव्यात, निधी अडथळ्यांशिवाय मिळावा आणि प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वय वृद्धिंगत व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस तालुक्यातील अनेक सरपंच, सदस्य, व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#ग्रामपंचायत #निधीवाटप #धाराशिवबैठक #आमदारकैलासपाटील #धाराशिवराजकारण
#उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!