राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय – संरक्षणाशी संबंधित कारवायांचे लाईव्ह रिपोर्टिंग बंदीच्या आदेश

नवी दिल्ली | प्रतिनिधी | ANTARSANWAD NEWS :
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व प्रसारमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला कडक सूचना दिल्या आहेत. संरक्षण दलांकडून सुरू असलेल्या कारवायांचे लाईव्ह प्रक्षेपण किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या थेट रिपोर्टिंगमुळे संवेदनशील माहिती सार्वजनिक होण्याचा धोका असतो आणि शत्रूपक्ष ती माहिती वापरून देशविरोधात कारवाया करू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही सैनिकी कारवाई सुरू असताना तिचे थेट प्रक्षेपण किंवा त्वरित अपडेट्स देणे टाळावे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधित मीडिया हाऊसवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. माहितीचा योग्य वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने ठामपणे सांगितले आहे.

गौरगाव रस्ता सात महिन्यांपासून अर्धवट — नागरिक हैराण , आंदोलन ची भुमिका

गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) : निपाणी पाटी ते गौरगाव हा रस्ता मागील सात-आठ महिन्यांपासून केवळ…

नैसर्गिकरीत्या पिकवलेला केशर आंबा भक्ताने केला तुळजाभवानी चरणी दान

पाच एकर च्या बागेत भरघोस उत्पादन मिळाल्याने भक्ताने देवीच्या चरणी 101 किलोच्या केशर आंब्याची केली आरास…

ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ( अंतरसंवाद न्यूज ) – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांवर…

कंत्राटदाराचा महसूल प्रशासनाला ‘गुलिगत धोका’ — परवानगी एका ठिकाणची, मुरुम उचलला दुसरीकडून ; शासकीय महसूल?

काक्रंबा (ता. तुळजापूर) | तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम सुरू झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला…

खिरणीमळा परिसरात स्वच्छतेचा अभाव; नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा

धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील खिरणीमळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने तसेच घंटागाडी नियमित…

तलाठी व खाजगी लिपीक रंगेहाथ लाच घेताना अटक; धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई

धाराशिव (प्रतिनिधी) – तहसिल कार्यालयातील कामासाठी तलाठी व त्याच्या खाजगी लिपिकाने मिळून ५ हजार रुपयांची लाच…

बिबट्याचा हल्ला: मसला येथे शेतकऱ्यावर जीवघेणा प्रसंग, उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल

तुळजापूर (प्रतिनिधी) — तुळजापूर तालुक्यातील मसला येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोमवारी दुपारी सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने…

धनेश्वरी शिक्षण समूह व पाटील कुटुंबियांचे साखर कारखानदारीत पाऊल

श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्समध्ये आ. पाटील व डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा भागीदार म्हणून समावेश धाराशिव प्रतिनिधी- परभणी…

राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव

धाराशिव ता. 4: आपल्या मालकाचे 15 टक्के बुडाले याच तीव्र दुःख झाल्याने भाजपची मंडळी आता फडफड…

error: Content is protected !!