खिरणीमळा परिसरात स्वच्छतेचा अभाव; नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील खिरणीमळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने तसेच घंटागाडी नियमित न आल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर समस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दि 5 मे रोजी निवेदन देण्यात आले असून, तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, नागरिकांनी अनेक वेळा स्वच्छता निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एकच सफाई कर्मचारी संपूर्ण परिसरात पाठवून ‘काम झाले’ असे सांगितले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे. “स्वच्छता ही मूलभूत सेवा असून ती रोज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

 रोज नियमित घंटागाडी सेवा सुरु करावी, नाल्यांची व परिसराची नियमित साफसफाई करावी, तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी, आरोग्याच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत ह्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.

“जर तातडीने उपाययोजना झाली नाही, तर आमच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

या निवेदनावर साखीब सय्यद, महेबुब कुरेशी, जिशान सय्यद, पठाण मारुफ, आजम पठाण , नवाज कुरेशी, आसिफ कादरी , शेख आसेफ , मोमीन अली , गौस कुरेशी, टकारी जमीर , यांच्यासह अनेक नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!