धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील खिरणीमळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने तसेच घंटागाडी नियमित न आल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर समस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दि 5 मे रोजी निवेदन देण्यात आले असून, तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नागरिकांनी अनेक वेळा स्वच्छता निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एकच सफाई कर्मचारी संपूर्ण परिसरात पाठवून ‘काम झाले’ असे सांगितले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे. “स्वच्छता ही मूलभूत सेवा असून ती रोज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
रोज नियमित घंटागाडी सेवा सुरु करावी, नाल्यांची व परिसराची नियमित साफसफाई करावी, तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी, आरोग्याच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत ह्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.
“जर तातडीने उपाययोजना झाली नाही, तर आमच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या निवेदनावर साखीब सय्यद, महेबुब कुरेशी, जिशान सय्यद, पठाण मारुफ, आजम पठाण , नवाज कुरेशी, आसिफ कादरी , शेख आसेफ , मोमीन अली , गौस कुरेशी, टकारी जमीर , यांच्यासह अनेक नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
















