धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील खिरणीमळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने तसेच घंटागाडी नियमित न आल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर समस्त नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दि 5 मे रोजी निवेदन देण्यात आले असून, तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, नागरिकांनी अनेक वेळा स्वच्छता निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एकच सफाई कर्मचारी संपूर्ण परिसरात पाठवून ‘काम झाले’ असे सांगितले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे. “स्वच्छता ही मूलभूत सेवा असून ती रोज मिळणे अपेक्षित आहे. मात्र, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
रोज नियमित घंटागाडी सेवा सुरु करावी, नाल्यांची व परिसराची नियमित साफसफाई करावी, तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी, आरोग्याच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत ह्या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.
“जर तातडीने उपाययोजना झाली नाही, तर आमच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या निवेदनावर साखीब सय्यद, महेबुब कुरेशी, जिशान सय्यद, पठाण मारुफ, आजम पठाण , नवाज कुरेशी, आसिफ कादरी , शेख आसेफ , मोमीन अली , गौस कुरेशी, टकारी जमीर , यांच्यासह अनेक नागरिकांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल



















