धाराशिव ता. 4: आपल्या मालकाचे 15 टक्के बुडाले याच तीव्र दुःख झाल्याने भाजपची मंडळी आता फडफड करु लागली आहे. तुम्ही ज्या विद्यापीठाचा उल्लेख करताय ना त्याचे संस्थापकच राणा पाटील आहेत. फक्त टक्केवारीसाठी व आपल उखळ पांढरं करण्यासाठी राणा पाटील भाजपात गेलेत. दुसऱ्या बाजूला ही दोन निष्ठावंत म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. तुमच्या कुल्हेकुहीनी काही फरक पडणार नसल्याचा पलटवार ठाकरे सेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी लगावला आहे.
यावेळी गुरव म्हणाले, पहिला मुद्दा ही कामे रखडली टक्केवारीसाठी अगदी बरोबर आहे. तुमचे मालक व दुसरे माजी पालकमंत्री यांच्या भांडनात ही कामे रखडली आहेत. यामुळे आमची मागणी आहे की मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करा म्हणजे तुमच्या विदयापीठ संस्थापकाच खरं रूप समोर येईल. ही कामे व्हावेत यासाठी सत्तेत असताना तुम्ही विरोधी मंडळीवर टक्केवारीच कारण सांगणं हास्यस्पदच नव्हे तर मूर्खपणा म्हणावा लागेल. दुसरं हे अंदाजपत्रकीय दराचे धोरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यासाठी बनविल्याचे तुम्ही सांगताय. इतके दिवस तुम्हाला या धोरणाची माहिती नसावी कदाचित कारण धाराशिव च्या कामाबाबत निर्णय हा दोन मे च्या पत्रात नमूद केला आहे. भुयारी गटार योजनेचे तुम्हाला एवढे वावडे होते तर भाजप देखील शिवसेनेबरोबर सत्तेत होती. तेव्हा त्याला विरोध करण्याची बुद्धी सुचली नाही काय? शिवाय प्रत्येक पक्षाचे त्यावेळी काढलेले जाहीरनामे तपासा आणि मग योजनेबद्दल बोलावे असा टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला. शहराच्या कामाना स्थगिती देणार तुमचं सरकार, कामाना आडकाटी आणणारे तुमचेच मालक, प्रत्येक पालकमंत्री यांच्याबद्दल तक्रार करणार तुमचेच नेते. मग या तक्रारी शुद्ध भावनेने करत असतील का? की यामागेही टक्केवारीचेच कारण आहे हे जनतेला समजलं आहे. त्यामुळे आपल्या मालकांना मिळणार 15 टक्के गेलेत त्याच एवढं दुःख व्यक्त करु नका असा चिमटा सोमनाथ गुरव यांनी काढला आहे. तुमचे मालक फक्त विकास कामातच टक्केवारी घेत नाहीत तर उमेदवाराकडून देखील वसुली करतात याचा अनुभव तुमच्या पक्षाचे जिल्हा निरीक्षक असलेले आमदार यांनी त्यामुळे उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे या जिल्ह्यात टक्केवारीची सुरवात ज्या संस्थापकांनी केली ते तुमचे मालक आहेत अशीही आठवण सोमनाथ गुरव यांनी करून दिली
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर















