धाराशिव ता. 4: आपल्या मालकाचे 15 टक्के बुडाले याच तीव्र दुःख झाल्याने भाजपची मंडळी आता फडफड करु लागली आहे. तुम्ही ज्या विद्यापीठाचा उल्लेख करताय ना त्याचे संस्थापकच राणा पाटील आहेत. फक्त टक्केवारीसाठी व आपल उखळ पांढरं करण्यासाठी राणा पाटील भाजपात गेलेत. दुसऱ्या बाजूला ही दोन निष्ठावंत म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. तुमच्या कुल्हेकुहीनी काही फरक पडणार नसल्याचा पलटवार ठाकरे सेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी लगावला आहे.
यावेळी गुरव म्हणाले, पहिला मुद्दा ही कामे रखडली टक्केवारीसाठी अगदी बरोबर आहे. तुमचे मालक व दुसरे माजी पालकमंत्री यांच्या भांडनात ही कामे रखडली आहेत. यामुळे आमची मागणी आहे की मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करा म्हणजे तुमच्या विदयापीठ संस्थापकाच खरं रूप समोर येईल. ही कामे व्हावेत यासाठी सत्तेत असताना तुम्ही विरोधी मंडळीवर टक्केवारीच कारण सांगणं हास्यस्पदच नव्हे तर मूर्खपणा म्हणावा लागेल. दुसरं हे अंदाजपत्रकीय दराचे धोरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यासाठी बनविल्याचे तुम्ही सांगताय. इतके दिवस तुम्हाला या धोरणाची माहिती नसावी कदाचित कारण धाराशिव च्या कामाबाबत निर्णय हा दोन मे च्या पत्रात नमूद केला आहे. भुयारी गटार योजनेचे तुम्हाला एवढे वावडे होते तर भाजप देखील शिवसेनेबरोबर सत्तेत होती. तेव्हा त्याला विरोध करण्याची बुद्धी सुचली नाही काय? शिवाय प्रत्येक पक्षाचे त्यावेळी काढलेले जाहीरनामे तपासा आणि मग योजनेबद्दल बोलावे असा टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला. शहराच्या कामाना स्थगिती देणार तुमचं सरकार, कामाना आडकाटी आणणारे तुमचेच मालक, प्रत्येक पालकमंत्री यांच्याबद्दल तक्रार करणार तुमचेच नेते. मग या तक्रारी शुद्ध भावनेने करत असतील का? की यामागेही टक्केवारीचेच कारण आहे हे जनतेला समजलं आहे. त्यामुळे आपल्या मालकांना मिळणार 15 टक्के गेलेत त्याच एवढं दुःख व्यक्त करु नका असा चिमटा सोमनाथ गुरव यांनी काढला आहे. तुमचे मालक फक्त विकास कामातच टक्केवारी घेत नाहीत तर उमेदवाराकडून देखील वसुली करतात याचा अनुभव तुमच्या पक्षाचे जिल्हा निरीक्षक असलेले आमदार यांनी त्यामुळे उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे या जिल्ह्यात टक्केवारीची सुरवात ज्या संस्थापकांनी केली ते तुमचे मालक आहेत अशीही आठवण सोमनाथ गुरव यांनी करून दिली
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार















