राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय – संरक्षणाशी संबंधित कारवायांचे लाईव्ह रिपोर्टिंग बंदीच्या आदेश

Spread the love

नवी दिल्ली | प्रतिनिधी | ANTARSANWAD NEWS :
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व प्रसारमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला कडक सूचना दिल्या आहेत. संरक्षण दलांकडून सुरू असलेल्या कारवायांचे लाईव्ह प्रक्षेपण किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या थेट रिपोर्टिंगमुळे संवेदनशील माहिती सार्वजनिक होण्याचा धोका असतो आणि शत्रूपक्ष ती माहिती वापरून देशविरोधात कारवाया करू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही सैनिकी कारवाई सुरू असताना तिचे थेट प्रक्षेपण किंवा त्वरित अपडेट्स देणे टाळावे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधित मीडिया हाऊसवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. माहितीचा योग्य वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने ठामपणे सांगितले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!