धाराशिव (प्रतिनिधी) – तहसिल कार्यालयातील कामासाठी तलाठी व त्याच्या खाजगी लिपिकाने मिळून ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव युनिटने सोमवारी (दि. ५ मे) सापळा रचत तलाठी व त्याच्या सहकाऱ्यास ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या गट नं. १५/१० मधील शेतजमिनीतून कुळाचे नाव कमी करण्यासाठी त्यांनी तहसिल कार्यालय, धाराशिव येथे अर्ज दाखल केला होता. यावर तहसिलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तलाठी भूषण वशिष्ठ चोबे (वय ३१) व त्यांचा खाजगी लिपीक भारत शंकर मगर (वय ६४) यांनी मिळून अर्जदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारीनंतर धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज (दि. ५ मे) वाघोली येथील तलाठी कार्यालयात ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान, तलाठी भूषण चोबे यांनी भारत मगर यांच्या मार्फत तक्रारदाराकडून ४ हजार रुपये स्वीकारले व त्याचवेळी त्यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपींच्या अंगझडतीत तलाठीकडून ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३० ग्रॅमचा चांदीचा कडा, सॅमसंग मोबाईल, पार्कर पेन, डेल कंपनीचा शासकीय लॅपटॉप तर खाजगी लिपिकाकडून लाच रक्कम ४ हजार रुपये, अतिरिक्त १०९० रुपये रोख व एक कीपॅड मोबाईल सापडला आहे. आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, दोघांच्या मोबाईलचा तपास केला जाणार आहे.
या प्रकरणी भूषण चोबे यांच्याविरुद्ध भ्र.प्र.क. अधिनियम कलम १२ व भारत मगर यांच्याविरुद्ध कलम ७ (अ) अंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक श्री. सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले असून, त्यांना पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील व नागेश शेरकर यांचे सहकार्य लाभले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप आटोळे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अशी माहिती ACB कडून देण्यात आली आहे.
भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 किंवा पोलीस अधीक्षक – 9923023361, पोलीस उप अधीक्षक – 9594658686 यांच्याशी संपर्क साधावा.
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल



















