गौरगाव रस्ता सात महिन्यांपासून अर्धवट — नागरिक हैराण , आंदोलन ची भुमिका

Spread the love

गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) : निपाणी पाटी ते गौरगाव हा रस्ता मागील सात-आठ महिन्यांपासून केवळ कच्चा अवस्थेत आहे. या मार्गावर काही ठिकाणी केवळ मोठी खडी टाकून डांबर टाकण्यात आले असले तरी रस्त्यावरील दुसरे दोन लियर न टाकल्याने वाहनचालकांना तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गौरगावचे रहिवासी उमाकांत पाटोळे यांनी सांगितले की, “या रस्त्यामुळे अनेक नागरिकांना पाठदुखी व हाडांचे त्रास सुरू झाले आहेत. इतके दिवस काम बंद ठेवून ठेकेदाराने निष्काळजीपणा दाखवलेला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, व प्रशासनाने ठेकेदाराला जसे काम दिले आहे तसे काम होत नसल्याचे देखील तक्रार यावेळी पाटोळे यांनी केली आहे. सकाळ प्रशासन दखल घेऊन उपाययोजना राबवण्यात अशी मागणी केली आहे.”

दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक याच मार्गावरून ये-जा करतात. मात्र रस्त्यामुळे अपघाताचेही प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा आंदोलनांची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!