धाराशिव शहरात रात्रीपासून वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची हजेरी; वीजपुरवठा खंडित

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात आज (१५ मे) रात्री आठ वाजल्यापासूनच वातावरणात बदल होत वादळी वारे वाहू लागले होते. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे संपूर्ण शहरात गारवा निर्माण झाला असला तरी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

पावसाच्या सुरुवातीपासूनच अनेक भागांत लाईट बंद झाल्याचे प्रकार घडले असून, काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडे कोसळल्याचीही माहिती आहे.

महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी शक्यतो घरातच थांबावे, विजेच्या उपकरणांपासून दूर राहावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ‘अंतरसंवाद न्यूज’ वाचत राहा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!