धाराशिव – गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाची काल सोडत जाहीर झाली. ही सोडत जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांना उमेदवारीचे स्वप्न पडू लागली असून इच्छुकांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आरक्षणाची सोडत काहींना निराश करणारी असली तरी त्यांनी त्यातून आपला B plan तयार ठेवला असून त्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आत्तापासूनच वातावरण तापवण्यास सुरुवात केली असून “यंदा फिक्स” व “भावी” असे बिरूद लावत सोशल वातावरण निर्मिती करताना दिसून येत आहेत.
तेरखेडा गट हा सर्वसाधारण गटासाठी राखीव सुटल्याने विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. तेरखेडा गटातून विकी चव्हाण यांना संधी मिळावी अशी त्यांच्या मित्रमंडळींची इच्छा असून त्यांनी आत्तापासूनच सोशल मीडियावर जोरदार धमाका करण्यास सुरुवात केली आहे.
तेरखेडा येथील विकी चव्हाण हे सर्व सामान्य घरातील एक व्यक्तिमत्व असून एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, धनंजय सावंत, प्रतापसिंह पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी कुस्तीच्या फडात अनेक मल्लांना “आसमान” दाखवले आहे. सर्वसाधारण कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असताना त्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत आपली ओळख निर्माण केली आहे तसेच दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख असून आज त्यांचा मित्रमंडळाचा मोठा वर्ग आहे. तसेच बड्या-बड्या राजकीय मंडळींसोबत त्यांची उठ बस असून त्यांची वेगळी ओळख आहे. माजी मंत्री तथा भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या विजयात देखील विकी चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विकी चव्हाण यांना तेरखेडा जिल्हा परिषद गटातून संधी मिळाली तर या संधीचं नक्कीच सोनं होईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न
- ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; वाद मिटविण्याची सुवर्णसंधी
- अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज – प्रा.ॲड.मंजुषा साखरे
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी






















