जनता दरबारात लोकांच्या अडचणींना न्याय देण्याचा प्रयत्न — आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पुढाकार

Spread the love

धाराशिव, दि. ११ (अंतरसंवाद न्यूज) – महाराष्ट्र इनस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष व तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

हा जनता दरबार सोमवार, दिनांक १२ मे २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे पार पडणार आहे. या दरम्यान नागरिकांनी आपली समस्या लिखित स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून मांडण्याचे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे.

दरबारामध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येची गांभीर्याने दखल घेण्यात येईल व त्या सोडवण्यासाठी योग्य पातळीवर प्रयत्न केले जातील, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

#जनता_दरबार #तुळजापूर #धाराशिव #jantadarbar #tuljapur #dharashiv


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!