धाराशिव | ११ मे २०२४
भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी जिल्हा प्रशासन व मा. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे रोजी सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी नाका मार्गावर नियोजित “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती.
मात्र, भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील ताज्या घडामोडी व संभाव्य सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा व तालुका स्तरावरील रॅली रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने घेण्यात आला असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच सहभागी संस्था व अधिकारी यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही या निर्णयाची माहिती देण्यात आली असून, पुढील सूचना प्रशासनामार्फत वेळोवेळी दिल्या जातील.
या निर्णयाची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांनी प्रसिद्धीस दिली.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी














