धाराशिव – भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरज वाढली असून कोळगे व कुलकर्णी यांच्यासह अनेक नावे सध्या चर्चेत आहे. पुढील आठवड्यामध्ये ही निवड होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस शिगेला पोहोचली असून, विविध नेत्यांची नावे समोर येत आहेत. पक्षात दीर्घकाळ सेवा केलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले रामदास सुभाषराव कोळगे हे या पदासाठी आघाडीच्या दावेदारांपैकी एक मानले जात आहेत.
रामदास कोळगे हे 1989 पासून भाजपमध्ये सक्रीय असून, त्यांनी युवा मोर्चा, किसान मोर्चा, बजरंग दल, विहिप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांतून कार्य केले आहे. भूम-वाशी तालुक्यात त्यांनी संघ प्रचारक म्हणून एक वर्ष सेवा दिली आहे. 1993 च्या भूकंपात मदतकार्य, अटल पणन समिती व बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यावर तज्ज्ञ संचालक म्हणून योगदान, तसेच सलग तीन वेळा पंचायत समिती सदस्य व उपसभापती म्हणून कार्यकाल – अशा विविध अंगाने त्यांनी आपली राजकीय वाटचाल सिद्ध केलेली आहे. सध्या समर्थ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले कोळगे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडावी, अशी कार्यकर्त्यांमध्ये मागणी असून, ते नेहमी पक्षाची ध्वजवाहक भूमिका पार पाडत आले आहेत.
दुसरे नाव दत्ता कुलकर्णी यांचे असून ते धाराशिव जिल्ह्यात व इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या उद्योग समूह उभा केला असून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक मल्टीस्टेट कॉपरेट सोसायटी प्रायव्हेट लिमिटेड ची बँक देखील जिल्हाभरात सर्वेकडे कार्यरत आहे.
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजपच्या स्थानिक संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज भासू लागली आहे, आणि यामुळेच कुलकर्णी यांचे ही नाव पुन्हा पुढे आले आहे.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा राजकीय अनुभव
दत्ताभाऊ कुलकर्णी हे धाराशिव जिल्ह्यातील एक अनुभवी आणि प्रभावशाली भाजप नेते आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वी यशस्वीपणे पार पाडली असून, पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्ह्यात विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले असून धाराशिव जिल्ह्यात देखील त्यांचे राजकीय वजन चांगले आहे. झालेल्या लोकसभा व विधानसभेमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून पक्ष त्यांना पुढे मोठी जबाबदारी देईल अशीच भूमिका दिसत आहे.
पक्षातील अंतर्गत चर्चासत्रे
धाराशिव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या जिल्हाध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू आहे. काही कार्यकर्त्यांनी युवा नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केली आहे, तर काहींनी अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल अधिक स्थिर होईल, असे मत व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर, दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे
जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संभाव्य यादी पुढीलप्रमाणे :
रामदास कोळगे, प्रदेश सचिव भाजप किसान मोर्चा
दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष , उद्योजक
संताजी चालुक्य, विद्यमान जिल्हाध्यक्ष
नेताजी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
अजित पिंगळे , कळंब
विनोद कपाट, प्रदेश कार्यकारणी सदस्य
व्यंकटराव गुंड, प्रदेश कार्यकारणी सदस्य
संतोष बोबडे, माजी तालुकाध्यक्ष
विजय शिंगाडे, माजी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष
अनिल काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य
गेल्या वेळेस जिल्हाध्यक्ष पद अंतिम क्षणी संताजी काका चालुक्य यांच्याकडे गेले होते, यंदा मात्र अनेक नावाची प्रबळ चर्चा आहे. मात्र या यादीतील कोणीही जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य ठरू शकतो. त्यामुळे या नेत्यांपैकी किंवा इतर कोणाच्या गळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक




















