आमदार-खासदार आमने-सामने; वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढाओढ, प्रभाग बदलामुळे माजी नगरसेवकांसमोर मोठे आव्हान
धाराशिव ( सलीम पठाण )
धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या निवडणुका जरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या असल्या तरी त्यात थेट आमदार, खासदार आणि विरोधी गटातील नेत्यांनीही सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक नेत्यासाठी ही निवडणूक “आपले वर्चस्व सिद्ध करण्याची परीक्षा” ठरणार आहे.
—
🔸 धाराशिव जिल्ह्याचे राजकीय चित्र
धाराशिव जिल्ह्यात सध्या राजकीय पातळीवर अत्यंत रंगतदार समीकरण आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि धाराशिव , उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे तीघेही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) आहेत.
तर तुळजापूर मतदारसंघाचे आमदार भाजपचे आहेत.
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचे) आहेत.
या सर्वांचे वेगवेगळ्या गटांमधील असलेले नाते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक ठळकपणे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडीतील गटबाजी उफाळून येत आहे.
—
🔸 महायुतीत आणि महाविकास आघाडीत दोन्हीकडे मतभेद
महायुतीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप हे स्वतंत्र लढतीच्या तयारीत दिसत आहेत, तर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यातही स्वतंत्र उमेदवारीचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मात्र या निवडणुकांपासून अलिप्त राहील, असे स्पष्ट चित्र आहे.
जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे एकही लोकप्रतिनिधी उरले नसल्याने पक्षाची उपस्थिती जवळपास संपुष्टात आली आहे, असे मानले जात आहे.
—
🔸 प्रभाग रचना बदलामुळे माजी नगरसेवकांसमोर मोठी कसरत
धाराशिव जिल्ह्यातील अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये दोन ते तीन वर्षांपासून प्रशासकांचा कारभार सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यामुळे माजी नगरसेवकांसमोर मोठी कसरत उभी राहिली आहे.
प्रभाग रचना पूर्णपणे बदलल्याने अनेक माजी नगरसेवकांना नवीन प्रभागात लोकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. नागरिकांच्या नाराजीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—
🔸 “आता तरी संधी मिळावी” – कार्यकर्त्यांचा सूर
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पातळ्यांवर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसत आहे. अनेक कार्यकर्त्यांचा सूर स्पष्ट आहे –
“दरवेळी आम्ही दुसऱ्याचा झेंडा घेऊनच फिरायचं का? या निवडणुकीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आता तरी संधी मिळायला हवी.”
या भावना जिल्हाभर उमटत असून त्यामुळे निवडणुकीत नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभाग रचना बदलली; मतदारही संभ्रमात
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये प्रभाग रचना पूर्णपणे बदलल्यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नागरिक एका प्रभागात राहतात, परंतु त्यांचे नाव दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत आले आहे. या गोंधळामुळे मतदारांची उपस्थिती आणि मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडीने धाराशिव नगरपालिकेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला असून, निवडणूक विभागाने यावर योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
तर भाजपने देखील याच संदर्भात आपले म्हणणे अधिकृतरित्या निवडणूक विभागाकडे सादर केल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजप आणि महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषद…
भाजपची पत्रकार परिषद महाविकास आघाडीवर टीका.., निवडणूक विभागावर आक्षेप?
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?
- वाशी पोलिसांची धाडसी कारवाई; पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अफू लागवड प्रकरणी कारवाईनंतर समाधान उघडे यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुकवर घोषणा

























