धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सरकारला वठणीवर आणण्यासाठी व्यापक लढा उभारला जाणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शेतकरी हक्क परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या वेळी राजकीय मतभेद व भूमिका बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचा निर्धार सर्व संघटनांनी व्यक्त केला.
बैठकीत कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, बोगस बी-बियाणे या गंभीर मुद्द्यांसह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर सरकार चालढकल करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. परिणामी, चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचेही नेत्यांनी नमूद केले.
या विश्वासघातकी सरकारविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. तर राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन माध्यमातून या परिषदेत सहभागी झाले.
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील






















