धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सरकारला वठणीवर आणण्यासाठी व्यापक लढा उभारला जाणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शेतकरी हक्क परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या वेळी राजकीय मतभेद व भूमिका बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचा निर्धार सर्व संघटनांनी व्यक्त केला.
बैठकीत कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, बोगस बी-बियाणे या गंभीर मुद्द्यांसह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर सरकार चालढकल करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. परिणामी, चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचेही नेत्यांनी नमूद केले.
या विश्वासघातकी सरकारविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. तर राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन माध्यमातून या परिषदेत सहभागी झाले.
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल






















