धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सरकारला वठणीवर आणण्यासाठी व्यापक लढा उभारला जाणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शेतकरी हक्क परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व शेतकरी संघटनांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. या वेळी राजकीय मतभेद व भूमिका बाजूला ठेवून केवळ शेतकरी हितासाठी एकत्र येण्याचा निर्धार सर्व संघटनांनी व्यक्त केला.
बैठकीत कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव, बोगस बी-बियाणे या गंभीर मुद्द्यांसह इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर सरकार चालढकल करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. परिणामी, चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचेही नेत्यांनी नमूद केले.
या विश्वासघातकी सरकारविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. तर राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन माध्यमातून या परिषदेत सहभागी झाले.
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
- हैदराबादच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालयात आढावा बैठक उत्साहात संपन्न
- ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; वाद मिटविण्याची सुवर्णसंधी
- अनुसूचित जाती जमातीवर अन्याय, अत्याचार होणारच नाहीत यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज – प्रा.ॲड.मंजुषा साखरे

















