अवैध मुरुम उत्खननावर प्रशासनाची कासवगती; कंत्राटदाराला दिलासा?

Spread the love


धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा वापर करण्यात येत असून, हा मुरुम बिनपरवाना आणि अवैधरित्या उत्खनन करून आणल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचे चित्र असून, कारवाईऐवजी कंत्राटदाराला अप्रत्यक्षरित्या संरक्षण दिल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.

सदर महामार्गाच्या कामासाठी किती मुरुम लागतो, याचे अचूक गणित जिल्हा प्रशासनाकडे असताना देखील कुठून व किती मुरुम आणण्यात आला, याची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे हा मुरुम नेमका कुठून आणि कोणत्या आधारावर आणण्यात आला, हे मोठे कोडे ठरत आहे. आतापर्यंत झालेले उत्खनन, त्याचा वापर आणि साठवण याची कोणतीही मोजणी अद्याप जिल्हा प्रशासनाने केलेली नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, या उत्खननाला काही अधिकाऱ्यांची मूक संमती असल्याचे बोलले जात असून, परवानगीशिवाय उत्खनन सुरू ठेवण्यासाठी ‘सलाम’ संस्कृतीचा आधार घेतला जात असल्याचा आरोपही काही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे हे ‘मुरुमायण’ कोणाच्या दिग्दर्शनाखाली सुरू आहे, याचा तपास आता गरजेचा बनला आहे.

सद्यस्थितीत कंत्राटदाराने उत्खनन केलेला मुरुम रस्त्यामध्ये वापरून “असे काही घडलेच नाही” असा आव आणण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु हे सगळे प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात असूनही ठोस कारवाई का होत नाही, हा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

अंतरसंवाद News


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!