धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा वापर करण्यात येत असून, हा मुरुम बिनपरवाना आणि अवैधरित्या उत्खनन करून आणल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचे चित्र असून, कारवाईऐवजी कंत्राटदाराला अप्रत्यक्षरित्या संरक्षण दिल्याचा आरोप स्थानिकांतून होत आहे.
सदर महामार्गाच्या कामासाठी किती मुरुम लागतो, याचे अचूक गणित जिल्हा प्रशासनाकडे असताना देखील कुठून व किती मुरुम आणण्यात आला, याची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे हा मुरुम नेमका कुठून आणि कोणत्या आधारावर आणण्यात आला, हे मोठे कोडे ठरत आहे. आतापर्यंत झालेले उत्खनन, त्याचा वापर आणि साठवण याची कोणतीही मोजणी अद्याप जिल्हा प्रशासनाने केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या उत्खननाला काही अधिकाऱ्यांची मूक संमती असल्याचे बोलले जात असून, परवानगीशिवाय उत्खनन सुरू ठेवण्यासाठी ‘सलाम’ संस्कृतीचा आधार घेतला जात असल्याचा आरोपही काही स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे हे ‘मुरुमायण’ कोणाच्या दिग्दर्शनाखाली सुरू आहे, याचा तपास आता गरजेचा बनला आहे.
सद्यस्थितीत कंत्राटदाराने उत्खनन केलेला मुरुम रस्त्यामध्ये वापरून “असे काही घडलेच नाही” असा आव आणण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु हे सगळे प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात असूनही ठोस कारवाई का होत नाही, हा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
– अंतरसंवाद News




- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?
- वाशी पोलिसांची धाडसी कारवाई; पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त





















