धाराशिव (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने खते मिळावीत यासाठी आज दिनांक २३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी मा. किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली खत उत्पादक कंपन्या व खत विक्रेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही परिस्थितीत खते खरेदी करताना शेतकऱ्यांवर लिंकींगचा (एका खतासोबत दुसरे खत घेण्याची सक्ती) दबाव आणू नये. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला MRP पेक्षा जास्त दराने खते विकल्यास संबंधित कंपनी किंवा विक्रेत्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
महत्त्वाचे निर्देश:
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते वेळेवर व सहज उपलब्ध करावीत.
खते विकताना एम.आर.पी.च्या बाहेर दर लावू नये.
वितरण प्रक्रिया पारदर्शक असावी.
कृषि सेवा केंद्रावर दर व उपलब्धतेची माहिती स्पष्टपणे लावावी.
कृत्रिम टंचाई निर्माण करू नये.
शेतकऱ्यांना सूचना: शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावीत. खरेदी करताना पक्की पावती घ्यावी आणि खताच्या पिशवीवरील दर बिलाशी जुळतो का याची खात्री करावी. अनुदानित खत खरेदी करताना ई-पॉस मशीनवरील बिल घ्यावे. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करणे आवश्यक आहे.
तक्रार निवारण व्यवस्था: शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हा तक्रार कक्षाचा संपर्क क्रमांक: ०२४७२-२२२३७९४. याशिवाय तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी किंवा क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडे देखील तक्रार नोंदवता येईल, असे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक श्री. रविंद्र माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषिक अॅपचा वापर:
खत विक्रेत्यांकडील अद्ययावत साठा पाहण्यासाठी ‘कृषिक अॅप’चा वापर करावा. तसेच शिफारसीनुसार खतांची निवड करून कोणत्याही कंपनीच्या नावाचा अट्टाहास न करता योग्य खत वापरणे फायदेशीर ठरेल.
- 🚨 धाराशिव बायपासवर भीषण अपघात – तरुणाचा जागीच मृत्यू, ट्रक चालक ट्रकसह फरार!
- 🚗 वाहनधारकांसाठी मोठी बातमी! लवकरच वार्षिक टोल पास योजना लागू होण्याची शक्यता 🚦
- 📰 आदर्श प्राथमिक व विद्यानिकेतन आश्रम शाळेत ‘आयुष्यमान भारत कार्ड’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
- 🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
- हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण; बंदुकीच्या धाकाने मारहाण, सोनसाखळी लंपास
- हॉटेल भाग्यश्री च्या मालकाची यशाची झेप – नवीकोरी फॉरच्युनर खरेदी करताच सोशल मीडियावर व्हायरल
- हे आले आहेत मार्केटमध्ये नवीन मोबाईल फोन! पहा संपूर्ण यादी 📱✨
- ही लढाई सत्य विरुद्ध असत्य आणि संस्कृतीच्या विरुद्ध विकृती अशी लढाई आहे – चित्रा वाघ
- हिवताप,डेंग्यू,चिकुनगुनिया वाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सीईओ डॉ.घोष यांचे स्वच्छतेचे आवाहन
- हिरकणी महोत्सवाच्या माध्यमातून धाराशिवच्या महिलांना रोजगाराची संधी मिळाली – अर्चना पाटील
- हिंमत असेल तर संपत्तीची अदलाबदल करा, मी गोरगरिबांना वाटून टाकेन!, निवेदनानंतर संपादक सुनील ढेपेंचा राणा पाटलांना थेट इशारा
- हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा – संताजी चालुक्य
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना
जयंतीनिमित्त धाराशिव येथे अभिवादन - हिंदी सक्तीच्या विरोधात धाराशिवमध्ये शासन आदेशाची होळी; ‘मराठी माणूस’ रस्त्यावर
- हिंगळजवाडीत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतीराज अभियान” अंतर्गत स्वच्छता व लोकसहभागावर मार्गदर्शन…
- हाती मशाल घेऊन निघालय पण आपण काय बोलतोय त्याचं भान नाही-मा.खा. रविंद्र गायकवाडांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
- हातलाई शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचे थाटात शुभारंभ
- हा थापांचा नाही तर आमच्या माय बापांचा अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस
- हवामानावर आधारित फळपिक विमा योजना : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी
- हरिभाऊ घोगरे हायस्कूल उपळे (मा.) येथे येडशी बिटस्तर शिक्षण परिषदेचा उत्साही आयोजन
- हजरत खाॅजा शमशोद्दीन गाजी ( रहे.) यांच्या उर्सानिमित्त शिवसेना ( शिंदे गट ) डॉक्टर सेल च्या वतीने आयोजित महाआरोग्यशिबीरास भरघोस प्रतिसाद
- स्पेलिंग बी स्पर्धेत आदर्श प्राथमिक आश्रम शाळेचा उत्साहपूर्ण सहभाग
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच? ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीचा निर्णय ६ मे रोजी अपेक्षित
- स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर
- स्तनपानामुळे आईचा कर्करोगाचा धोका कमी होतो – डॉ.कुलदीप मिटकरी , जिल्हा स्त्री रुग्णालयात स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन
- सोळा लाख कोटी उद्योगपतींचे कर्ज माफ शेतकरी मात्र वाऱ्यावर केंद्र सरकारच्या धोरणावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सरकारचे उपटले कान
- सोलार पंप बसविण्यासाठी खुल्या बाजारातील कंपन्या ठरविण्याचे अधिकार शेतकऱ्यांना द्या – आमदार कैलास पाटील
- सोलापूरची कडक भाकरी: महिलांसाठी स्वयंरोजगाराचा मजबूत आधार
- सोलापूर- तुळजापुर- धाराशिव रेल्वेमार्गासाठी संपादित जमीनीचा मावेजा थेट खरेदीप्रमाणे द्या –खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- सोलापूर एस.टी. स्टँड वरून १६ मे रोजी ईश्वरी शिंदे ही मुलगी हरवली – नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
- सोलापूर – तुळजापूर – धाराशिव रेल्वे मार्ग , १ सप्टेंबर पासून काम करण्याच्या सुचना – आ.राणाजगजितसिंह पाटील
- सोलर पंप योजनेच्या आढावा बैठकीस शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे आमदार कैलास पाटील यांचे आवाहन
- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरु करावीत हमीभाव केंद्रे – आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सोन्याच्या भाव वाढला!, आजचा नवा दर किती? वाचा सविस्तर
- सोन्याच्या दरात वाढ: आजचा नवा भाव काय?

































