खासदारांनी अर्धवटराव असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध केले…
हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा
– संताजी चालुक्य, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, धाराशिव
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ठाकरे सरकार राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सा द्यायला तयार होते तर त्याचा प्रस्ताव कुठे आहे? हवेतल्या गप्पा मारून स्वतः अर्धवटराव असल्याचे पुरावेच आज खासदार महोदयांनी सादर केले आहेत. ठाकरे सरकारने या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले होते तर त्याचे पुरावे जिल्ह्यातील नागरिकांना दाखवा.
मुळात खासदार चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे खोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने रंगवून सांगतात. ठाकरे सरकारने प्रस्ताव पूर्ण केला होता असे आज त्यांनी ठोकून दिले. मग तो प्रस्ताव आता कुठे आहे? हेही खासदार साहेबांनी जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावे. आता लवाद नेमायला लावतो अशी थापही त्यांनी मारली. लवाद हा प्रक्रियेचा भाग आहे. पण हे अर्धवटरावांना कोण सांगणार. भूसंपादन लवाद कोणाच्या सांगण्यावरून नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नेमला जात असतो. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येत आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याचवेळी या रेल्वेमार्गासाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात येत आहे त्यांना समाधानकारक मोबदला मिळावा यासाठी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील कटिबद्ध आहेत. त्यासाठी रास्त कायदेशीर बाबीचा अवलंब करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन बिनबुडाचे खोटेनाटे आरोप खासदारांनी केले आहेत. हिंमत असेल तर आपण केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवा. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करून खासदार साहेब आपण खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील तुमचे चरित्र आणि चारित्र्य आता जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया प्रेस नोट bjp osmanabad , bjposmanabaddist@gmail.com वरुन प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद..
२० जानेवारी २०२४ ला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची झालेली पत्रकार परिषद
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
Spread the loveकळंबः तालुक्यातील दहिफळ येथे जिल्हा परिषदेची माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी एकमेव शाळा आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी उच्च शिक्षणाचा एकमेव पर्याय असलेल्या या सरकारी शाळेत एकही महिला शिक्षीका नाही. विद्यार्थिनींच्या आरोग्य, सुरक्षितता व शैक्षणिक हिताच्या दृष्टीने किमान एक महिला शिक्षिका उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कळंबच्या वतीने करण्यात आली… - भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
Spread the love संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती जयंती उत्सवाचे आकर्षण हभप, भन्तेजी, मौलानांसह अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग धाराशिव,दि.22- विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.22) सायंकाळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला.… - धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
Spread the loveधाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न धाराशिव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हा कार्यालय येथे वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात… - धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
Spread the love धाराशिव : शहरातील गाजी मैदान येथे आज, १९ एप्रिल रोजी हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली.गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह सोप्या आणि सन्मानपूर्वक पद्धतीने व्हावेत, या उद्देशाने हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटी कडून गेल्या १८ वर्षांपासून सामुदायिक… - मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
Spread the loveमोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी जिल्हाध्यक्षांचे काम चांगले असेल त्यांना पुन्हा संधी मिळणार! – राजेश तिवारी धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – काँग्रेसच्यावतीने सर्वसामान्य जनतेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेता याव्यात यासाठी संघटन सृजन अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक बुथ…




