खासदारांनी अर्धवटराव असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध केले…
हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा
– संताजी चालुक्य, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, धाराशिव
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ठाकरे सरकार राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सा द्यायला तयार होते तर त्याचा प्रस्ताव कुठे आहे? हवेतल्या गप्पा मारून स्वतः अर्धवटराव असल्याचे पुरावेच आज खासदार महोदयांनी सादर केले आहेत. ठाकरे सरकारने या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले होते तर त्याचे पुरावे जिल्ह्यातील नागरिकांना दाखवा.
मुळात खासदार चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे खोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने रंगवून सांगतात. ठाकरे सरकारने प्रस्ताव पूर्ण केला होता असे आज त्यांनी ठोकून दिले. मग तो प्रस्ताव आता कुठे आहे? हेही खासदार साहेबांनी जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावे. आता लवाद नेमायला लावतो अशी थापही त्यांनी मारली. लवाद हा प्रक्रियेचा भाग आहे. पण हे अर्धवटरावांना कोण सांगणार. भूसंपादन लवाद कोणाच्या सांगण्यावरून नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नेमला जात असतो. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येत आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याचवेळी या रेल्वेमार्गासाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात येत आहे त्यांना समाधानकारक मोबदला मिळावा यासाठी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील कटिबद्ध आहेत. त्यासाठी रास्त कायदेशीर बाबीचा अवलंब करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन बिनबुडाचे खोटेनाटे आरोप खासदारांनी केले आहेत. हिंमत असेल तर आपण केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवा. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करून खासदार साहेब आपण खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील तुमचे चरित्र आणि चारित्र्य आता जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया प्रेस नोट bjp osmanabad , bjposmanabaddist@gmail.com वरुन प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद..
२० जानेवारी २०२४ ला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची झालेली पत्रकार परिषद
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
Spread the loveआ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडेपुण्यातील कचरा प्रक्रिया केंद्राला दिली भेट धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – पुणे येथील ग्रीन पृथ्वी सोल्युशन या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीस नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने दि.१० मार्च रोजी भेट दिली. तसेच प्रक्रिया संयंत्र केंद्र ( प्रोसेस प्लांट) ची पाहणी केली. यावेळी… - अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
Spread the loveअरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी धाराशिव ता.12: स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन साजरा करताना आपण त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाला स्मरण करतो. पण त्याच संभाजी महाराज यांच्या स्मारकाच काम संथ गतीने होत असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सांगत हा प्रश्न… - सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
Spread the love सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा धाराशिव ता. १०: राज्याला त्याच्या अर्थव्यवस्थेच्या टक्केवारीच्या २५ टक्केपर्यंत कर्ज घेता येते, मात्र आता सरकरने घेतलेल्या कर्जाची रक्कम ही जवळपास २४ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. साहजिक राज्य आर्थिक दिवाळखोरीत आल्याचं आमदार कैलास पाटील यांनी… - सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
Spread the love सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी धाराशिव प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनामार्फत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाणारी सारथी शिष्यवृत्ती योजना अचानक बंद करण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही योजना… - पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
Spread the love धाराशिव : खामगाव (ता. जि. धाराशिव) येथील प्रेमराज संपत गव्हाणे यांनी केवळ 21 व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात 8 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे खामगावसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.घरची नाजूक आर्थिक परिस्थिती असतानाही आणि साखर कारखान्यात काम…




