हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा – संताजी चालुक्य

Spread the love

खासदारांनी अर्धवटराव असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध केले…

हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा

– संताजी चालुक्य, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, धाराशिव

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ठाकरे सरकार राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सा द्यायला तयार होते तर त्याचा प्रस्ताव कुठे आहे? हवेतल्या गप्पा मारून स्वतः अर्धवटराव असल्याचे पुरावेच आज खासदार महोदयांनी सादर केले आहेत. ठाकरे सरकारने या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले होते तर त्याचे पुरावे जिल्ह्यातील नागरिकांना दाखवा.

मुळात खासदार चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे खोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने रंगवून सांगतात. ठाकरे सरकारने प्रस्ताव पूर्ण केला होता असे आज त्यांनी ठोकून दिले. मग तो प्रस्ताव आता कुठे आहे? हेही खासदार साहेबांनी जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावे. आता लवाद नेमायला लावतो अशी थापही त्यांनी मारली. लवाद हा प्रक्रियेचा भाग आहे. पण हे अर्धवटरावांना कोण सांगणार. भूसंपादन लवाद कोणाच्या सांगण्यावरून नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नेमला जात असतो. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येत आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याचवेळी या रेल्वेमार्गासाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात येत आहे त्यांना समाधानकारक मोबदला मिळावा यासाठी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील कटिबद्ध आहेत. त्यासाठी रास्त कायदेशीर बाबीचा अवलंब करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन बिनबुडाचे खोटेनाटे आरोप खासदारांनी केले आहेत. हिंमत असेल तर आपण केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवा. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करून खासदार साहेब आपण खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील तुमचे चरित्र आणि चारित्र्य आता जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया प्रेस नोट bjp osmanabad , bjposmanabaddist@gmail.com वरुन प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद..

२० जानेवारी २०२४ ला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची झालेली पत्रकार परिषद

आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील प्रतिक्रिया
  • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
    Spread the love धाराशिव | प्रतिनिधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील १६.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित…
  • आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
    Spread the love धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असून तो तात्काळ आणि ताबडतोब रद्द करण्यात यावा या मागणीसाठी धाराशिव येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप व रुक्मिणी लोंढे यांच्या उपस्थितीत दि.२८ जुलै रोजी महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये…
  • मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
    Spread the loveईटकूर (ता. कळंब) : मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने ईटकूर (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मल्हार पाटील यांनी शाळेला भेट देत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना…
  • आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
    Spread the love धाराशिव : आषाढी वारीचे औचित्य साधून श्री लिटल चॅम्प प्री. स्कूल, धाराशिव येथे वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभाग घेत विठ्ठलभक्तीचा संदेश दिला. टाळ, माळ, फेटा, नऊवारी साडी आणि पारंपरिक पोशाखामुळे शाळेचा परिसर भक्तिमय वातावरणाने…
  • रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
    नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील
    Spread the loveवीस विभागांमध्ये तपासणी व उपचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदानातूनही समाजसेवेचा संदेश धाराशिव : “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून, रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहण्याइतके मोठे सुख दुसरे नाही. सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी नियमित महाआरोग्य शिबिरे घेण्याचा आपला संकल्प असल्याचे भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!