खासदारांनी अर्धवटराव असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध केले…
हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा
– संताजी चालुक्य, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, धाराशिव
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ठाकरे सरकार राज्याच्या वाट्याचा पन्नास टक्के हिस्सा द्यायला तयार होते तर त्याचा प्रस्ताव कुठे आहे? हवेतल्या गप्पा मारून स्वतः अर्धवटराव असल्याचे पुरावेच आज खासदार महोदयांनी सादर केले आहेत. ठाकरे सरकारने या रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले होते तर त्याचे पुरावे जिल्ह्यातील नागरिकांना दाखवा.
मुळात खासदार चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे खोट्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने रंगवून सांगतात. ठाकरे सरकारने प्रस्ताव पूर्ण केला होता असे आज त्यांनी ठोकून दिले. मग तो प्रस्ताव आता कुठे आहे? हेही खासदार साहेबांनी जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावे. आता लवाद नेमायला लावतो अशी थापही त्यांनी मारली. लवाद हा प्रक्रियेचा भाग आहे. पण हे अर्धवटरावांना कोण सांगणार. भूसंपादन लवाद कोणाच्या सांगण्यावरून नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नेमला जात असतो. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येत आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याचवेळी या रेल्वेमार्गासाठी ज्यांची जमीन संपादित करण्यात येत आहे त्यांना समाधानकारक मोबदला मिळावा यासाठी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील कटिबद्ध आहेत. त्यासाठी रास्त कायदेशीर बाबीचा अवलंब करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन बिनबुडाचे खोटेनाटे आरोप खासदारांनी केले आहेत. हिंमत असेल तर आपण केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवा. व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करून खासदार साहेब आपण खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील तुमचे चरित्र आणि चारित्र्य आता जनतेसमोर आणण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया प्रेस नोट bjp osmanabad , bjposmanabaddist@gmail.com वरुन प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पत्रकार परिषद..
२० जानेवारी २०२४ ला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची झालेली पत्रकार परिषद
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
Spread the love धाराशिव, दि. 13 : लग्न लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करून नंतर 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज संग्राम पाटील (वय 28, मूळ रा. सुंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड, सध्या रा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय… - खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Spread the loveखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात धाराशिव : दि.10/06/2026 रोजी पोलीस ठाणे आंबी गुरण ९३/२६ कलम 103 (1), 3 (5) BNS प्रमाणे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खुनाचे प्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार असून नमूद फरार आरोपी नामे दीपक विक्रम गरड रा. चिंचपूर खुर्द ता. परंडा जि. धाराशिव हा बसवकल्याण, राज्य कर्नाटक… - वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Spread the loveवादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धाराशिव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या… - अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
Spread the love अहिल्यानगर, दि. ३ जून :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले… - कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
Spread the loveकर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण धाराशिव ता.3: राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून त्यांची थट्टा करणारी असल्याच मत आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे.त्यामध्ये ते म्हणाले की, २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या तब्बल…




