धाराशिव – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचा गंभीर मुद्दा ‘मुरुमायण’ या नावाने जिल्ह्यात गाजत असतानाच, अखेर या प्रकरणाची दखल पालकमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे याआधी हात झटकणारे प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे जनतेचे लक्ष खिळले आहे.
मुंबई येथे धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत काक्रंबा येथील अवैध उत्खननाचा मुद्दा अधिकृतपणे उपस्थित झाला. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
संबंधित कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून मुरुमाची चोरटी वाहतूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाने अद्यापही कारवाईच्या नावाने पानंही उलटलेली नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरते आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्या या प्रकारात कोणाचे संरक्षण मिळत आहे, हा खरा प्रश्न जनतेच्या मनात आहे.
स्थानिक तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना, “उत्खनन बेकायदेशीररित्या झाले आहे की नाही, याचे सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे. कंत्राटदाराने दोन गटातून परवानग्या घेतल्या असल्याचे समोर आले असून, तहसीलदार अरविंद बोळंगे आणि संबंधित तलाठ्यांना वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे स्पष्ट केले.
या साऱ्या प्रकारावर जनतेचा एकच सवाल आहे — इतक्या दिवसांनी ही हालचाल का? आणि हे ‘मुरुमायण’ फक्त चौकशीच्या फेऱ्यांतच अडकून राहणार की ठोस कारवाईसह पूर्णविराम मिळणार?
प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती, तर आज हा मुद्दा पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची गरजच भासली नसती. आता जेव्हा थेट मंत्र्यांनी लक्ष घातले आहे, तेव्हा जिल्हा प्रशासन खरोखर कार्यवाही करणार का, की पुन्हा नव्या मुरुमायणाची स्क्रिप्ट लिहिण्यात व्यस्त राहणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन


















