धाराशिव – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरुमाच्या अवैध उत्खननाचा गंभीर मुद्दा ‘मुरुमायण’ या नावाने जिल्ह्यात गाजत असतानाच, अखेर या प्रकरणाची दखल पालकमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे याआधी हात झटकणारे प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे जनतेचे लक्ष खिळले आहे.
मुंबई येथे धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत काक्रंबा येथील अवैध उत्खननाचा मुद्दा अधिकृतपणे उपस्थित झाला. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
संबंधित कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून मुरुमाची चोरटी वाहतूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाने अद्यापही कारवाईच्या नावाने पानंही उलटलेली नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरते आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्या या प्रकारात कोणाचे संरक्षण मिळत आहे, हा खरा प्रश्न जनतेच्या मनात आहे.
स्थानिक तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना, “उत्खनन बेकायदेशीररित्या झाले आहे की नाही, याचे सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून केले जाणार आहे. कंत्राटदाराने दोन गटातून परवानग्या घेतल्या असल्याचे समोर आले असून, तहसीलदार अरविंद बोळंगे आणि संबंधित तलाठ्यांना वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे स्पष्ट केले.
या साऱ्या प्रकारावर जनतेचा एकच सवाल आहे — इतक्या दिवसांनी ही हालचाल का? आणि हे ‘मुरुमायण’ फक्त चौकशीच्या फेऱ्यांतच अडकून राहणार की ठोस कारवाईसह पूर्णविराम मिळणार?
प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती, तर आज हा मुद्दा पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची गरजच भासली नसती. आता जेव्हा थेट मंत्र्यांनी लक्ष घातले आहे, तेव्हा जिल्हा प्रशासन खरोखर कार्यवाही करणार का, की पुन्हा नव्या मुरुमायणाची स्क्रिप्ट लिहिण्यात व्यस्त राहणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?





















