नापास झाला तरी सेलिब्रेशन! कर्नाटकमधील एका विद्यार्थ्याच्या कुटुंबाने दाखवला सकारात्मक दृष्टिकोन

Spread the love

बागलकोट (कर्नाटक) :
दहावीच्या परीक्षेत अपयश आले तरीही निराश न होता, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा आदर्श दाखवणारी घटना कर्नाटकमधील बागलकोट येथे घडली आहे. अभिषेक चोळचागुट्टा या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत केवळ 200 गुण मिळाले आणि तो नापास ठरला. मात्र त्याच्या अपयशावर रडगाणं गाण्याऐवजी त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं मनोबल वाढवण्यासाठी वेगळा निर्णय घेतला.

अभिषेकच्या आई-वडिलांनी त्याच्यावर राग न काढता, उलट त्याच्या हातून केक कापून सेलिब्रेशन केलं. या अनोख्या साजशृंगारामागील उद्देश स्पष्ट होता – मुलगा नापास झाला असला तरी त्याचं मनोबल खच्ची न होता, त्याने पुढच्या वेळी नव्या उमेदीनं तयारी करावी.

अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं की, “अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आम्हाला त्याला दोष देण्यात वेळ वाया घालवायचा नव्हता, तर त्याला समजून घेऊन पुढील वाटचालीसाठी आधार द्यायचा होता.”

सध्या ही सकारात्मक दृष्टीकोन दाखवणारी घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली असून अनेकांनी अभिषेकच्या कुटुंबाचं कौतुक केलं आहे.

संपादन – अंतरसंवाद न्यूज


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!