मंत्रालय, मुंबई | दि. ३ जून २०२५
राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यामुळे हजारो एस.टी. कर्मचाऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.
घोषित महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:
✅ ५३% महागाई भत्ता आता एस.टी. कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्या एकूण पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.
✅ ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना’ राबविण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय तपासणी, समुपदेशन, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती यांचा समावेश आहे.
✅ रु. ५ लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय सेवा एस.टी. कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.
✅ स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्यात आले आहे.
अपघातात निधन झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास रु. १ कोटींपर्यंत विमा संरक्षण मिळणार.
✅ निवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना व त्यांच्या पत्नीला वर्षभरासाठी एस.टी. प्रवास मोफत पास देण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याचाही आम्ही विचार केला आहे. हा निर्णय त्यासाठीच महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले की, “एस.टी. कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे.” यावेळी सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
#EknathShinde #PratapSarnaik #STKarmachari #MSRTC #TransportMinister #MaharashtraGovernment #STEmployeeWelfare
MSRTC News 2025, ST Employees Benefits, Maharashtra Government Decisions, Eknath Shinde Announcements, Pratap Sarnaik Transport Minister, ST Mahangai Bhatta, ST Medical Yojana, MSRTC Retirement Pass.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन


















