उमरगा : जिल्हा समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास निधीचे समान वाटप करावे. कामांचे वाटप करताना जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी भाजपचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी विजयी झाले. त्यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला. आमदार सत्ताधारी पक्षाचे नसल्यामुळे निधीचे वाटप करताना उमरगा तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, असे शिंदे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. २००९ पासून उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. युती असल्यामुळे भाजपला या मतदारसंघातून संधी मिळाली नाही.
राज्यात भाजपची सत्ता असूनही उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला आहे. शक्तीशाली आमदार बहुतांश निधी आपापल्या मतदारसंघांत नेतात. त्यामुळे उमरगा-लोहारा मतदारसंघ वंचित राहू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसतानाही प्रामाणिकपणे, झोकून देऊन पक्षाचे काम करणारऱ्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. निधी आला तरच विकाकामे होतील, लोकांची सोय होईल. याचा पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ २०२९ मध्ये खुला होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपला या मतदारसंघातून संधी आहे. विकासकामांच्या बळावर भाजप तळागाळात पोहोचू शकेल. याचा विचार करून जुन्या, निष्ठांवत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, त्यांना बळ द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे.
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
















