उमरगा : जिल्हा समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या विकास निधीचे समान वाटप करावे. कामांचे वाटप करताना जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी भाजपचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
उमरगा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी विजयी झाले. त्यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव केला. आमदार सत्ताधारी पक्षाचे नसल्यामुळे निधीचे वाटप करताना उमरगा तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, असे शिंदे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. २००९ पासून उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. युती असल्यामुळे भाजपला या मतदारसंघातून संधी मिळाली नाही.
राज्यात भाजपची सत्ता असूनही उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला आहे. शक्तीशाली आमदार बहुतांश निधी आपापल्या मतदारसंघांत नेतात. त्यामुळे उमरगा-लोहारा मतदारसंघ वंचित राहू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसतानाही प्रामाणिकपणे, झोकून देऊन पक्षाचे काम करणारऱ्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. निधी आला तरच विकाकामे होतील, लोकांची सोय होईल. याचा पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक विचार करावा, अशीही मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ २०२९ मध्ये खुला होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपला या मतदारसंघातून संधी आहे. विकासकामांच्या बळावर भाजप तळागाळात पोहोचू शकेल. याचा विचार करून जुन्या, निष्ठांवत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, त्यांना बळ द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे.
- खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; जिल्हा काँग्रेसचा सामाजिक उपक्रमराहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; जिल्हा काँग्रेसचा सामाजिक उपक्रम
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार,मोबाईल व ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावे
- आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे , वेद शैक्षणिक संकुलात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी निरोप
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न















