धाराशिव : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ११ वीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. याआधी केवळ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रांमध्येच ही प्रक्रिया लागू होती. मात्र आता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागांतील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया सक्तीने लागू करण्यात आली आहे.
या निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात जिल्हास्तरावर अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांकडून विहित नमुन्यात माहिती संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालक, विद्यार्थी आणि शाळांना या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती असणे अत्यावश्यक आहे.
विद्यालयांची तयारी गरजेची
सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी शासनाच्या संकेतस्थळावर संस्थेची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी इंटरनेट सुविधा, आवश्यक कागदपत्रांची पूर्वतयारी, तसेच विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन व्यवस्था विद्यालयांनी करणे गरजेचे आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शासन मान्यता आदेश, शाखा व विषय मान्यता, अल्पसंख्याक प्रमाणपत्र, बँक डिटेल्स आणि शुल्क संबंधी कागदपत्रे आधीच तयार ठेवावी लागतील.
विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया कशी असेल?
विद्यार्थ्यांनी दोन टप्प्यांत नोंदणी करावी लागेल — इयत्ता १० वीचा निकाल लागण्यापूर्वी आणि नंतर. अर्ज दोन भागांत भरायचा असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की गुणपत्रक, टी.सी., जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र, आधारकार्ड, फोटो वगैरे तयार ठेवणे गरजेचे आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थी मोबाईल किंवा त्यांच्या शाळेतील मदतीने अर्ज करू शकतात.
प्रवेशासाठी एकूण चार फेऱ्या असतील. पहिली फेरी ‘शून्य फेरी’ असेल जी केवळ पूर्वतयारीसाठी असेल. राखीव कोटे आणि द्विलक्षी अभ्यासक्रमांसाठी देखील स्वतंत्र नोंदणी गरजेची आहे. प्रवेश ही संबंधित प्रवर्गानुसार – अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, आर्थिक दुर्बल घटक, इ. आरक्षणानुसार दिली जाणार आहे.
प्रशासनाकडून आवाहन
शासनाच्या ऑनलाईन प्रवेश संकेतस्थळावर वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या वेळापत्रक व सूचना यांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीने दिलेले प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. पालक, विद्यार्थी, प्राचार्य व शाळा व्यवस्थापन यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. यासंदर्भात तालुका व जिल्हास्तरावर लवकरच मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक












