धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात गेल्या पाच दिवसांपासून रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी, माशा आणि डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. आरोग्य विभागाच्या महिला प्रमुख अधिकारी सध्या “आरोग्य कारण” सांगून रजेवर आहेत, त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.






विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नव्याने निवडण्यात आलेल्या ठेकेदाराने अनेक भागांत नाल्यांची स्वच्छता केलीच नाही, तरीही लाखो रुपयांची बिले नगरपालिकेत जमा करण्यात आली आहेत. काम न करता ही बिले कशी मंजूर झाली? आणि ठेकेदाराची थकबाकी एवढी वाढलीच कशी? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, ठेकेदाराने मागील काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे स्वच्छतेचे काम बंद केल्याची माहिती समोर आली आहे. जर ठेकेदार कामच करत नसेल, तर नगरपालिका प्रशासनाने त्याच्याशी केलेला करार का सुरू ठेवला? आणि नंतरही त्याचे बिले मंजूर का झाली? यावर उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक ठरत आहे.
शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, हॉस्पिटल परिसर, शाळांच्या आजूबाजूचे रस्ते याठिकाणी कचरा साचल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत चालला आहे.
नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत पालिका प्रशासन व ठेकेदाराच्या संदिग्ध व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक संस्थांकडून देण्यात आला आहे.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा



















