धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात गेल्या पाच दिवसांपासून रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी, माशा आणि डासांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. आरोग्य विभागाच्या महिला प्रमुख अधिकारी सध्या “आरोग्य कारण” सांगून रजेवर आहेत, त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.






विशेष म्हणजे, गेल्या वर्षी नव्याने निवडण्यात आलेल्या ठेकेदाराने अनेक भागांत नाल्यांची स्वच्छता केलीच नाही, तरीही लाखो रुपयांची बिले नगरपालिकेत जमा करण्यात आली आहेत. काम न करता ही बिले कशी मंजूर झाली? आणि ठेकेदाराची थकबाकी एवढी वाढलीच कशी? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, ठेकेदाराने मागील काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे स्वच्छतेचे काम बंद केल्याची माहिती समोर आली आहे. जर ठेकेदार कामच करत नसेल, तर नगरपालिका प्रशासनाने त्याच्याशी केलेला करार का सुरू ठेवला? आणि नंतरही त्याचे बिले मंजूर का झाली? यावर उत्तरदायित्व निश्चित करणे आवश्यक ठरत आहे.
शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, हॉस्पिटल परिसर, शाळांच्या आजूबाजूचे रस्ते याठिकाणी कचरा साचल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत चालला आहे.
नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत पालिका प्रशासन व ठेकेदाराच्या संदिग्ध व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक संस्थांकडून देण्यात आला आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला

















