धाराशिव शहरातल्या डीपी रस्त्याच्या कामाच्या निविदेबाबत नगर विकास खात्याने काढलेला आदेश हा आमच्या आंदोलनाला आलेले यश असल्याचा खोटा दावा उबाठा गट करीत सुटला आहे. धूळफेक करण्यात ही मंडळी माहीर आहे. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अंदाजित दरापेक्षा अधिकच्या दराच्या निविदांना मंजुरी न देता अंदाजपत्रकात नमूद केलेल्या दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने राज्यात सगळीकडे नगरविकास विभागाची कामे करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. हा आदेश केवळ धाराशिव शहरापुरता असल्याचा कांगावा करण्यात उबाठा गट धन्यता मानून आंदोलनामुळेच हे यश आल्याचा खोटा दावा करीत सुटले असून त्यांचा दावा म्हणजे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असून आंदोलन टक्केवारीसाठी की जनतेसाठी केले लवकरच पुराव्यानिशी उघडकीस आणणार.
मुळात नगरोत्थान योजनेतंर्गत असलेली ही कामे राज्यातील अन्य शहरात जवळपास पूर्ण होत आली आहेत.आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात धाराशिव शहर नसताना जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोठा पाठपुरावा करून या कामासाठी खास बाब निधी मंजूर करून घेतला आहे.तुम्ही मात्र यासाठी कांहीही न करता यात टक्केवारीसाठी खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले.आपल्याच धाराशिव शहरातील या सर्व कामांना उशीर का झाला..? टक्केवारीसाठी यात कोणी कशा प्रकारे खोडा घातला..? जिल्ह्यात टक्केवारी वसुलीच्या विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू कोण आहेत ..? लवकरच पुराव्यानिशी सगळा लेखाजोखा जनतेसमोर आपण आणणार आहोत. त्यानंतर डोळे झाकून दूध पिणारे मांजर कोण आहे? आणि कुणामुळे शहरातील सगळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत याचा सगळा दस्तऐवज खुला करणार आहोत.
चांगल्या रस्त्याचे शहर म्हणून राज्यभर ओळख असलेले धाराशिव शहरातील रस्ते नावालाही शिल्लक राहिले नाहीत. टक्केवारीसाठी तुम्ही लादलेली भुयारी गटार योजना रस्त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. डोंगर दऱ्यावर वसलेल्या धाराशिव शहरात जरी अतिवृष्टी झाली तरी केवळ पाच मिनिटात सगळ्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होतो. असे असतानाही भुयारी गटार योजना का आणली..? यातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा कोण हडप केला. भुयारी गटार योजनेतून कोणत्या तिघांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले हे पुराव्यानिशी सांगण्याची वेळ आता आली आहे. भुयारी गटारीतून कोणी-कोणी स्वतःचे हात धुवून घेतले याची देखील आम्ही सविस्तर पोलखोल करणार आहोत. आंदोलनाचे स्टंट करून पाच वर्षात केलेलय भ्रष्ट कारभारावर आणि स्वतःच्या पापावर पांघरूण पडेल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा
बुरखा आम्ही फाडला असून तुमचा खरा चेहरा पुराव्यानिशी जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा


















