धाराशिव शहरातल्या डीपी रस्त्याच्या कामाच्या निविदेबाबत नगर विकास खात्याने काढलेला आदेश हा आमच्या आंदोलनाला आलेले यश असल्याचा खोटा दावा उबाठा गट करीत सुटला आहे. धूळफेक करण्यात ही मंडळी माहीर आहे. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अंदाजित दरापेक्षा अधिकच्या दराच्या निविदांना मंजुरी न देता अंदाजपत्रकात नमूद केलेल्या दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने राज्यात सगळीकडे नगरविकास विभागाची कामे करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. हा आदेश केवळ धाराशिव शहरापुरता असल्याचा कांगावा करण्यात उबाठा गट धन्यता मानून आंदोलनामुळेच हे यश आल्याचा खोटा दावा करीत सुटले असून त्यांचा दावा म्हणजे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असून आंदोलन टक्केवारीसाठी की जनतेसाठी केले लवकरच पुराव्यानिशी उघडकीस आणणार.
मुळात नगरोत्थान योजनेतंर्गत असलेली ही कामे राज्यातील अन्य शहरात जवळपास पूर्ण होत आली आहेत.आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात धाराशिव शहर नसताना जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोठा पाठपुरावा करून या कामासाठी खास बाब निधी मंजूर करून घेतला आहे.तुम्ही मात्र यासाठी कांहीही न करता यात टक्केवारीसाठी खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले.आपल्याच धाराशिव शहरातील या सर्व कामांना उशीर का झाला..? टक्केवारीसाठी यात कोणी कशा प्रकारे खोडा घातला..? जिल्ह्यात टक्केवारी वसुलीच्या विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू कोण आहेत ..? लवकरच पुराव्यानिशी सगळा लेखाजोखा जनतेसमोर आपण आणणार आहोत. त्यानंतर डोळे झाकून दूध पिणारे मांजर कोण आहे? आणि कुणामुळे शहरातील सगळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत याचा सगळा दस्तऐवज खुला करणार आहोत.
चांगल्या रस्त्याचे शहर म्हणून राज्यभर ओळख असलेले धाराशिव शहरातील रस्ते नावालाही शिल्लक राहिले नाहीत. टक्केवारीसाठी तुम्ही लादलेली भुयारी गटार योजना रस्त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. डोंगर दऱ्यावर वसलेल्या धाराशिव शहरात जरी अतिवृष्टी झाली तरी केवळ पाच मिनिटात सगळ्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होतो. असे असतानाही भुयारी गटार योजना का आणली..? यातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा कोण हडप केला. भुयारी गटार योजनेतून कोणत्या तिघांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले हे पुराव्यानिशी सांगण्याची वेळ आता आली आहे. भुयारी गटारीतून कोणी-कोणी स्वतःचे हात धुवून घेतले याची देखील आम्ही सविस्तर पोलखोल करणार आहोत. आंदोलनाचे स्टंट करून पाच वर्षात केलेलय भ्रष्ट कारभारावर आणि स्वतःच्या पापावर पांघरूण पडेल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा
बुरखा आम्ही फाडला असून तुमचा खरा चेहरा पुराव्यानिशी जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही



















