धाराशिव शहरातल्या डीपी रस्त्याच्या कामाच्या निविदेबाबत नगर विकास खात्याने काढलेला आदेश हा आमच्या आंदोलनाला आलेले यश असल्याचा खोटा दावा उबाठा गट करीत सुटला आहे. धूळफेक करण्यात ही मंडळी माहीर आहे. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अंदाजित दरापेक्षा अधिकच्या दराच्या निविदांना मंजुरी न देता अंदाजपत्रकात नमूद केलेल्या दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने राज्यात सगळीकडे नगरविकास विभागाची कामे करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. हा आदेश केवळ धाराशिव शहरापुरता असल्याचा कांगावा करण्यात उबाठा गट धन्यता मानून आंदोलनामुळेच हे यश आल्याचा खोटा दावा करीत सुटले असून त्यांचा दावा म्हणजे आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असून आंदोलन टक्केवारीसाठी की जनतेसाठी केले लवकरच पुराव्यानिशी उघडकीस आणणार.
मुळात नगरोत्थान योजनेतंर्गत असलेली ही कामे राज्यातील अन्य शहरात जवळपास पूर्ण होत आली आहेत.आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात धाराशिव शहर नसताना जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मोठा पाठपुरावा करून या कामासाठी खास बाब निधी मंजूर करून घेतला आहे.तुम्ही मात्र यासाठी कांहीही न करता यात टक्केवारीसाठी खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले.आपल्याच धाराशिव शहरातील या सर्व कामांना उशीर का झाला..? टक्केवारीसाठी यात कोणी कशा प्रकारे खोडा घातला..? जिल्ह्यात टक्केवारी वसुलीच्या विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू कोण आहेत ..? लवकरच पुराव्यानिशी सगळा लेखाजोखा जनतेसमोर आपण आणणार आहोत. त्यानंतर डोळे झाकून दूध पिणारे मांजर कोण आहे? आणि कुणामुळे शहरातील सगळे रस्ते खड्ड्यात गेले आहेत याचा सगळा दस्तऐवज खुला करणार आहोत.
चांगल्या रस्त्याचे शहर म्हणून राज्यभर ओळख असलेले धाराशिव शहरातील रस्ते नावालाही शिल्लक राहिले नाहीत. टक्केवारीसाठी तुम्ही लादलेली भुयारी गटार योजना रस्त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. डोंगर दऱ्यावर वसलेल्या धाराशिव शहरात जरी अतिवृष्टी झाली तरी केवळ पाच मिनिटात सगळ्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होतो. असे असतानाही भुयारी गटार योजना का आणली..? यातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा कोण हडप केला. भुयारी गटार योजनेतून कोणत्या तिघांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले हे पुराव्यानिशी सांगण्याची वेळ आता आली आहे. भुयारी गटारीतून कोणी-कोणी स्वतःचे हात धुवून घेतले याची देखील आम्ही सविस्तर पोलखोल करणार आहोत. आंदोलनाचे स्टंट करून पाच वर्षात केलेलय भ्रष्ट कारभारावर आणि स्वतःच्या पापावर पांघरूण पडेल असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा
बुरखा आम्ही फाडला असून तुमचा खरा चेहरा पुराव्यानिशी जनतेसमोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

- आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे , वेद शैक्षणिक संकुलात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी निरोप
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
















