धाराशिव/-
1 कॉल प्रॉब्लेम सॉल, हा डायलॉग आपण पिक्चर मध्ये पाहिला आहे परंतु याचा प्रत्यय दहिफळ ता.कळंब येथील ग्रामस्थांना गुरुवार (दि.1मे ) रोजी आला आहे.
दहिफळ येथील ग्रामस्थ गेल्या 2 वर्षापासून कळंब बोरवली या नवीन बस सुरू होण्यासाठी पाठपुरावा करत होते. परंतु यानात्याकारणाने त्यात यश येत नव्हते. त्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी 1 मे रोजी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सकाळी 09:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्या कानावर ही व्यथा घातली. पालकमंत्र्यांनी डायरेक्ट विभाग नियंत्रकांना फोन करून आत्ताच्या आत्ता तात्काळ कळंब- बोरवली ,मोहा ,दहिफळ,येरमाळा पुणे मार्गे गाडी सुरू करून आलेल्या ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून त्याचे व्हिडिओ व फोटो पाठविण्याची आदेश दिला. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली धाराशिव वरून ग्रामस्थ गावात पोचेपर्यंत कळंब बोरवली नवी कोरी गाडी गावात दाखल झाली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला कारण गेले 2 वर्षापासून पाठपुरावा करत असतानाही यश येत नव्हते परंतु फक्त एका फोनवर गाडी चालू झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी गाडीची पूजा करून पाठपुरावा करणाऱ्या दिलीप अंगरखे, सदाशिव वाघमारे, रामेश्वर भातलवंडे, प्रल्हाद मते, सुजित भातलवंडे, यांच्या हस्ते नारळ फोडून ड्रायव्हर ,कंडक्टर यांना फेटे,एसटी बसला पुढील बाजूस नारळाचे फाटे बांधून शुभारंभ करण्यात आला.यावेळी सरपंच चरणेश्वर पाटील ग्रामसेवक सुदर्शन मडके, सुरेश मते, पोपट पाटील,अंगद मते, भाऊ सुतार,तानाजी मते,महादेव अंगरखे,सतीश मते,बालाजी मते, समाधान मते,समाधान भातलवंडे, ज्योतीबा ढवळे, दत्तात्रय चंदनशिवे, बाराते सह ग्रामस्थांची व परिसरातील नागरिकांची यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
त्यामुळे बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून यंत्रणा सुतासारखी सरळ केल्यामुळे ग्रामस्थांना व परिसरातील 25 ते 30 गावातील प्रवासाचा होणारा त्रास यामुळे कमी होणार आहे. दहिफळ ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान क तीर्थक्षेत्र दर्जा असून त्यामुळे हजारो खंडोबा भाविक दर रविवारी,यात्रेला येथे येत असतात. त्यामुळे गावाकडील व परिसरातील पुणे ,मुंबई नोकरी कामानिमित्त स्थायिक झालेल्या नागरिकांसाठी ही मोठी सोय उपलब्ध झालेली आहे. ही बस कळंब खेर्डा,बोर्डा ,मोहा ,वाघोली गौर,दहिफळ ,सापनाई,येरमाळा,बार्शी,पुणे मार्गे बोरिवली जाईल
त्यामुळे ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल

- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!

- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव

- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ

- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा

- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे

- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप

- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर

- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’

नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती

सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध

- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी

- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले

- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन

- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार



















