


तुळजापूर – लातूर महामार्गावरील काक्रंबा येथे बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सुरू झाले आहे. या कामामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी या कामासंदर्भात गंभीर अनियमितता समोर आली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदार कंपनीने प्रशासनाची फसवणूक करत बांधकामासाठी लागणारा मुरुम आजूबाजूच्या गावांमधून अवैधरित्या उत्खनन करून आणण्यास सुरुवात केली आहे. या मुरुम उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही शेतजमिनींचेही नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या मुरुम उचलला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होत असून धूळधक्कड वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य कायदेशीर मार्गाने आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने उपलब्ध करून देण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
उड्डाणपूलाचे महत्त्व : औसा – तुळजापूर मार्गावर असलेल्या या उड्डाणपुलामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. मात्र हे काम जर नियमबाह्य पद्धतीने केले जात असेल, तर शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक

- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला

- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी

- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे

- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा

- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश

- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल










