


तुळजापूर – लातूर महामार्गावरील काक्रंबा येथे बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सुरू झाले आहे. या कामामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी या कामासंदर्भात गंभीर अनियमितता समोर आली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदार कंपनीने प्रशासनाची फसवणूक करत बांधकामासाठी लागणारा मुरुम आजूबाजूच्या गावांमधून अवैधरित्या उत्खनन करून आणण्यास सुरुवात केली आहे. या मुरुम उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर काही शेतजमिनींचेही नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या मुरुम उचलला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होत असून धूळधक्कड वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य कायदेशीर मार्गाने आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने उपलब्ध करून देण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
उड्डाणपूलाचे महत्त्व : औसा – तुळजापूर मार्गावर असलेल्या या उड्डाणपुलामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. मात्र हे काम जर नियमबाह्य पद्धतीने केले जात असेल, तर शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे

- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन

- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास

- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !

- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती










