धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 1 मे रोजी जिल्हा नियोजन समितीची (DPDC) बैठक पार पडली. यानंतर कृषी विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माने यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले, “खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा होणे आवश्यक आहे. महाबीजच्या बियाण्यांची मागणी आधीच पाठवावी आणि बोगस खत विक्री रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी.” त्यांनी शेतकऱ्यांना खत तपासणी किट उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.
या बैठकीला आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सीईओ डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
खासदार निंबाळकर यांनी कृषी विभागाने पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज अधोरेखित केली. “शेतकरी केळी लागवडीकडे वळावे, त्यासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे,” असे त्यांनी सांगितले. हे बोलताना त्यांनी रवींद्र माने यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली. पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, “खासदार ओमराजेंनी अधिकाऱ्याचं कौतुक केलं हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं.”
या बैठकीत सन 2024-25 मधील विविध योजनांची माहिती देताना माने यांनी सांगितले की, फळबाग लागवड, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेतबांध प्रयोगशाळा, भांडार उभारणी, घरगुती बियाण्यांचा वापर यासारख्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात काम झाले आहे.
श्री. माने यांनी पर्जन्यमान, अतिवृष्टी अहवाल, खत साठा, ऊस पिकातील तंत्रज्ञानाचा वापर, ॲग्रीस्टॅक नोंदणी, नाविन्यपूर्ण उपक्रम यांची आकडेवारी सादर केली. त्यावर समाधान व्यक्त करत पालकमंत्री व खासदारांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक

- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला

- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी

- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे

- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी

- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा

- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश








