मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत ७.२८ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
रामटेक ५.८२ टक्के
नागपूर ७.७३ टक्के
भंडारा- गोंदिया ७.२२ टक्के
गडचिरोली- चिमूर ८.४३ टक्के
चंद्रपूर ७.४४ टक्के