धाराशिव (ता. 30 एप्रिल 2025 ) – जिल्ह्यातील हवामान फळबाग लागवडीस अत्यंत अनुकूल असून, शेतकऱ्यांनी फळपिके घेतल्यास आर्थिक उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्र पाठवून १ मे २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मग्रारोहयो (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत फळबाग लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांचे ठराव मंजूर करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत मग्रारोहयो, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, नामांतर्गत डोंगराळ व अनुसूचित क्षेत्रांत फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ग्रामसभेच्या ठरावात त्यांची नावे समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेली नावे पुढील लेबर बजेटमध्ये समाविष्ट केल्यास रोजगार निर्मितीसह फलोत्पादन क्षेत्रात वाढ साधता येईल. शेतकऱ्यांच्या अर्थिक उन्नतीसाठी ही संधी अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून आपल्या नावाचा ठरावात समावेश होत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- शिवसेनेच्या वर्धापन दिनी मानवतेचा वसा; बोन मॅरोग्रस्त चिमुकल्यासाठी शिवसेनेकडून २५ हजारांची मदत

- खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; जिल्हा काँग्रेसचा सामाजिक उपक्रमराहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; जिल्हा काँग्रेसचा सामाजिक उपक्रम

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार,मोबाईल व ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावे

- आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे , वेद शैक्षणिक संकुलात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी निरोप

- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा





