धाराशिव (ता. 30 एप्रिल 2025 ) – जिल्ह्यातील हवामान फळबाग लागवडीस अत्यंत अनुकूल असून, शेतकऱ्यांनी फळपिके घेतल्यास आर्थिक उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्र पाठवून १ मे २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मग्रारोहयो (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत फळबाग लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांचे ठराव मंजूर करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत मग्रारोहयो, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, नामांतर्गत डोंगराळ व अनुसूचित क्षेत्रांत फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ग्रामसभेच्या ठरावात त्यांची नावे समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेली नावे पुढील लेबर बजेटमध्ये समाविष्ट केल्यास रोजगार निर्मितीसह फलोत्पादन क्षेत्रात वाढ साधता येईल. शेतकऱ्यांच्या अर्थिक उन्नतीसाठी ही संधी अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून आपल्या नावाचा ठरावात समावेश होत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार…, ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश..

- वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

- जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे मनःपूर्वक आभार भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

- आश्रमशाळा शिंगोलीत संविधान दिनानिमित्त विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व पालक मेळाव्याचे आयोजन

- सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत अनियमितता? भविष्यातील तारखांच्या सह्या आढळल्याने प्रश्नचिन्ह





