11 तासांचा थरार, मुलगा सुखरूप कीडनॅपर जेरबंद! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस प्रशासनाचे मानले आभार!

Spread the love

जालना : कृष्णा मूजमुले पाटील, राहणार जालना यांचा मुलगा श्रीहरी कृष्णा मूजमुले पाटील वय वर्षे 13 या मुलाचे शाळेत जाताना सकाळी 8 च्या सुमारास रस्त्यातून अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर तब्बल 2 तासांनी मुलाच्या वडिलांना कीडनॅपरचा फोन करून मुलाच्या सुटकेच्या बदल्यात 5 कोटीची खंडणी मागितली.

कोणतीही वेळ न गमावता मुलाच्या वडिलांनी सदर हकीकत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख Dr. Omprakash Shete यांना फोनवर कळवली. ओमप्रकाशजी यांनी सदर बाब राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री Devendra Fadnavis जी यांच्या कानावर घातली.

देवेंद्रजी यांनी तात्काळ यासंदर्भात ऍक्शन घेत जालन्याचे SP यांना यासंदर्भात सूचना दिल्या आणि अपडेट्स देण्याच्या सूचना केल्या. स्वतः गृहमंत्री लक्ष घातल्याने पोलीस देखील ऍक्शन मोडवर आले. जालना SP यांनी Add. SP च्या नेतृत्वात तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांची पथके तयार करण्यात आली. घटनेला 2 तास उलटून झाल्याने अपहरणकर्ते जास्त लांब गेले नसतील, या दिशेने तपास सुरू झाला. रस्त्यातील CCTV फुटेज खंगाळत पोलिसांनी अपहरणकर्त्याचे आयडेंटीफिकेशन करण्यास यश मिळाले. अपहरण झाल्या 5 तासात पोलिसांनी आरोपी आयडेंटीफाय केले. इकडे अपहरण कर्ते मुलाच्या वडिलांना फोन करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागू लागले. 5 कोटी नाही दिले तर मुलाला एड्सचा स्टेरॉइड देऊन जीवे मारू अशी धमकी देऊ लागले.

गरीब मराठा समाजातून छोटा आयुर्वेदीक मेडिकलचा व्यवसाय करणाऱ्या मुलाच्या वडीलाने अपहरणकर्ते यांना विनवणी करू लागले, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत 5 लाख रुपये पर्यंत देतो, पण शेवटी 10 लाख रुपये देण्याचे ठरवलं गेले. पोलिसांनी सगळी सूत्रे हातात घेतल्याने आरोपींचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात झाली. पण, मुलगा सुखरूप राहिला पाहिजे या दिशेने पोलीस काम करत होते.

10 लाख रुपये देण्याचं ठरलं असल्याने पैशाचा व्यवस्था करून मुलाच्या वडीलांना थोड्यावेळापूर्वी (आज रात्री ) साडे 8 वाजता मंठा रोड डी- मार्ट जालना या ठिकाणी  येण्यास सांगितल. पोलिसांनी रचलेल्या सापळ्या प्रमाणे मुलाचे वडील 10 लाख रूपये घेऊन निघाले.

त्या ठिकाणी गेल्यावर अपहरणकर्त्यांना 10 लाख रुपये देऊन मुलाला ताब्यात घेतलं. पैसे घेऊन तिथून पळ काढण्या आधीच पोलिसांनी झडप घातली. राहुल गेरूवाल आणि वर्मा व अरबाज शेख या नावाच्या तीन अपहरण कर्त्याच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.

योगायोग असा ही एक आहे…

अपहरण झालेल्या मुलाची बहीण, कृष्णा मूजमुळे पाटील यांची कन्या धनश्री कृष्णा मूजमुळे पाटील ह्या मुलीचे 7 वर्षा आधी ह्रदय प्रत्यारोपण करण्यात आले. त्यावेळी सुद्धा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी, कृष्णा मूजमुळे पाटील कुटुंबीयांच्या मदतीला देव बनवून धावून आले. मुलीच्या सर्व ऑपरेशन खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून करण्यात आला होता.

मुलगी धनश्री व मुलगा श्रीहरी या दोन्ही मुलांचा पुनर्जन्म झाला.. माझं,  मुलांच्या वडिलांशी काही वेळापूर्वी बोलण त्यावेळी त्यांनी सांगितलं की, देवेंद्रजी मुळे माझ्या दोन्ही मुलांना पुनर्जन्म मिळालं आहे. ग्रँड सॅल्युट जालना पोलीस! ‘देवा’ ला कधीच जातीपातीचे बंधने नसतात… देव सगळीकडे असतोच अशी प्रतिक्रिया प्रकाश गाडे यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!