Osmanabad – 40 Loksabha election 2024
धाराशिव- उस्मानाबाद ४० लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ दि.०५ एप्रिल २०२४ रोजी संयजोनी ओमप्रकाश राजे निंबाळकर सह शुभांगीताई कैलास घाडगे-पाटील यांनी कळंब तालुक्यातील बाभळगाव परतापूर, उमरा, पानगाव गावास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या गृहणी यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी गाव भेटी देऊन प्रचार सुरू केले आहे.
महायुती कडून धाराशी लोकसभेसाठी महिला उमेदवार देत नाराशक्तीचा नारा देत आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिल्याने. धाराशिव उस्मानाबाद ४० लोकसभा मतदारसंघातील लढत ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 5 एप्रिल रोजी धाराशिव जिल्ह्यात तामलवाडी टोल नाका येथे अर्चना पाटील यांच्ये जंगी स्वागत करण्यात आले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनेक सभांमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये घेतलेल्या मतांपेक्षा एक तरी मत जास्त घेऊन निवडून येईल असा आशा व्यक्त केली होती त्याचप्रमाणे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी देखील मतदार संघात दांडगा संपर्क आहे. व त्याच्या जोरावर मी 101% निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया देखील अर्चना पाटील यांनी दिली आहे.
दोन्हीही उमेदवार जरी म्हणत असले मी निवडून येतो मात्र जनता कोणाच्या पाठीशी उभी राहिली हे चित्र निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटात नाराजीचे चित्र दिसत आहे तर वंचित बहुजन आघाडी व ओबीसी पक्ष देखील या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार आहेत. या मतदारसंघांमध्ये काहीजण अपक्ष उमेदवार देखील उभे राहणार आहेत. अपक्ष उमेदवाराची लॉटरी देखील लागू शकते किंवा जास्त मतदान घेणाऱ्या उमेदवाराचे गणित देखील बिघडू शकतात.
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
Spread the love धाराशिव, दि. 13 : लग्न लावून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करून नंतर 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराज संग्राम पाटील (वय 28, मूळ रा. सुंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड, सध्या… - खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Spread the loveखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात धाराशिव : दि.10/06/2026 रोजी पोलीस ठाणे आंबी गुरण ९३/२६ कलम 103 (1), 3 (5) BNS प्रमाणे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खुनाचे प्रकरणातील मुख्य आरोपी हा फरार असून नमूद फरार आरोपी नामे दीपक विक्रम गरड रा. चिंचपूर खुर्द ता. परंडा जि.… - वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Spread the loveवादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धाराशिव : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष डॉ.… - अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
Spread the love अहिल्यानगर, दि. ३ जून :- जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न… - कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
Spread the loveकर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण धाराशिव ता.3: राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून त्यांची थट्टा करणारी असल्याच मत आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे.त्यामध्ये ते म्हणाले की, २०१९…




